पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. पाककडून पूंछमधील केजी सेक्टर, कुपवाडामधीर केरन सेक्टर आणि राजौरीमधील मंजाकोट आणि नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला.
पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात काल तीन भारतीय जवान शहीद झाले होते. त्याचाच भारताने आज सडेतोड बदला घेतला. पाकिस्तानने काल भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबनाही केली होती.
दरम्यान पाकिस्तानच्या या हल्लाला सडेतोड उत्तर दिलं जाईल, असं इंडियान आर्मीने कालच ठणकावलं होतं. त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली.