या फुग्यांसोबत एक पत्रही मिळाले आहे. उर्दूमध्ये लिहलेल्या या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्यात आली आहे. या पत्रात, ''मोदी ऐका, अयूबीची तलवार आजही आमच्याकडे आहे. मोदी सरकार युद्ध करु शकत नाही,'' असं म्हटलं आहे. या पत्राच्या खाली पाकिस्तानी जनता असे नमुद करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी पठाणकोटच्या हवाईतळावर दहशतवादी घुसले होते. या हल्ल्यात चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर भारतीय लष्कराचे तीन जवानांना वीरमरण आलं होतं.