हा आरोप बेजबाबदार असल्याचा दावा संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी केला. जेटलींनी रामगोपाल यादव यांचे सर्व आरोप फेटाळले. भारताकडे मोठ्या प्रमाणात दारुगोळा आहे. देशाला चिंता करण्याची गरज नाही, असं अरुण जेटली म्हणाले.
काय आहे 'कॅग'चा अहवाल?
तीन दिवसांपूर्वी समोर आलेला 'कॅग'चा अहवाल दोन्ही सभागृहातील गोंधळाचं मूळ कारण आहे. भारताकडील 40 टक्के दारुगोळा युद्धाच्या परिस्थिती पहिल्या दहा दिवसांमध्ये संपून जाईल. तर युद्धात 70 टक्के टँक आणि 44 टक्के तोफा दहा दिवसात संपतील, असं 'कॅग'च्या अहवालात म्हटलं होतं. मात्र युद्ध परिस्थितीत कमीत कमी 40 दिवस पुरेल, एवढा दारुगोळा उपलब्ध असणं गरजेचं असल्याचं संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे.