Amrendra Kumar Singh on Pahalgam Terror Attack : अवघ्या देशाचे नंदनवन असलेल्या दक्षिण जम्मू आणि काश्मीरमधील मिनि स्वित्झर्लंड ओळख असलेल्या पहलगामध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघा देश स्तब्ध होऊन गेला आहे. मात्र दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांकडून उच्चारलेल्या शब्दांमुळे देशामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यानंतर 'धर्म पुछा, जाति नही' असे म्हणत उन्मादी प्रवृत्तींनी विखारी प्रचाराला प्रारंभ करत स्थानिक काश्मिरी लोकांना सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये हिंदी विरुद्ध मुस्लिम असा सुद्धा रंग देण्याचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी आणि दहशतवाही हल्ल्यापासून अवघ्या 300 ते 400 मीटर दूर असलेल्या अमरेंद्र कुमार सिंह यांनी (Amrendra Kumar Singh on Pahalgam Terror Attack) या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्यांना सणसणीत चपराक दिली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटर पोस्टने धर्मांधाना चपराक बसली आहे.
हॉटेलवाल्यांनी पेमेंट घेतलं नाही, गाडीवाल्यांनी पैसे घेतले नाहीत
अमरेंद्र कुमार सिंह सपत्नीक जम्मू-काश्मीर पर्यटनासाठी गेले होते आणि त्यांनी जो काही रक्तपात बैसरन व्हॅलीमध्ये झाला तो त्यांनी प्रत्यक्ष पाहिला. यानंतर त्यांनी ट्विटर पोस्ट करून एक प्रकारे तेथील भयकंप सांगण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक लोकांनी कशा पद्धतीने मदत केली याबाबत त्यांनी सांगितलं आहे. गिधाडं संधी शोधत असतात. मात्र ज्या ठिकाणी हॉटेलवाल्यांनी पेमेंट घेतलं नाही, गाडीवाल्यांनी पैसे घेतले नाहीत, ड्रायव्हर सुद्धा रडत होता. जबरदस्ती केल्यानंतर त्याने टिप्स घेतली. मात्र, त्याचवेळी श्रीनगर ते दिल्ली विमान तिकीट 38 हजार झालं होतं, अशा शब्दात त्यांनी आपली संताप व्यक्त केला. दहशतवादी दहशतवाद्यांविरुद्धची लढाई सुरूच राहिली पाहिजे आणि संपूर्ण राष्ट्राने यामध्ये एकजूट राहिले पाहिजे असे अमरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.
अमरेंद्र सिंह यांनी काय म्हटलं आहे पोस्टमध्ये?
पहलगाममध्ये काल मृत्युमुखी पडलेल्या सर्व मृतांना विनम्र श्रद्धांजली आणि देव त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. "देव ज्याचे रक्षण करतो, त्याला कोणीही इजा करू शकत नाही" हे ऐकून आनंद होतोच, पण मारल्या गेलेल्या निष्पाप लोकांबद्दल प्रचंड दुःख आणि रागही आहे, ज्यात किमान तीन घोडे मालकांचा समावेश आहे. घटनास्थळापासून फक्त 300 ते 400 मीटर अंतरावर मी आणि मोना घोड्यावर होतो. अचानक गोळ्यांचा आवाज आणि लोक पळून जाण्याचा आवाज पाहून आम्हाला लगेच कळले आणि आमचा जीव धोक्यात घालून आमचा घोडेस्वार आम्हाला घेऊन पळून गेला. मग मी पहलगाममध्येच असलेल्या हॉटेलमध्ये परत आलो. दौरा काल सुरू झाला आणि हे सर्व पहिल्याच दिवशी घडले. मग आम्ही भविष्यातील सर्व कार्यक्रम सोडून आजचे तिकीट घेतले आणि परत येत आहोत. फ्लाईट संध्याकाळची आहे आणि आम्ही नुकतेच विमानतळावर पोहोचलो आहोत.
कोणत्याही सुरक्षा दलातील एकही जवान तिथे तैनात नव्हता
तुम्हाला विनंती आहे की तुम्ही दिशाभूल करू नका, मी बातम्यांमध्ये ऐकले की रेकी करण्यात आली होती, जर तुम्हाला ते माहित असेल तर तुम्ही ते का होऊ दिले, कोणत्याही सुरक्षा दलातील एकही जवान तिथे तैनात नव्हता. बरं, आता राजकारण सुरूच राहील, कोणी म्हणत आहे 'धर्म पुछा, जाति नही'. अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. जे गेले आहेत त्यांच्याबद्दल मला खूप दुःख आहे. लक्षात ठेवा की हजारो बचावकार्य केवळ स्थानिक पाठिंब्यामुळेच शक्य झाले आहे. घोडा मालक, गाडी मालक आणि हॉटेल मालक यांचे सहकार्य उत्कृष्ट होते. तथापि, गिधाडे संधी शोधत राहतात, जिथे हॉटेल मालकाने पैसे घेतले नाहीत, गाडी मालकाने पैसे घेतले नाहीत, ड्रायव्हरने रडून मला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मला टिप्स मिळाल्या, तर मला रु. श्रीनगर ते दिल्ली दोन तिकिटांसाठी 38,000. दहशतवादी आणि दहशतवाद्यांविरुद्धची लढाई सुरूच राहिली पाहिजे आणि संपूर्ण राष्ट्राने यामध्ये एकजूट राहिले पाहिजे.
इतर महत्वाच्या बातम्या