अर्थसंकल्प सादरीकरणावर प्रश्नचिन्ह
एबीपी माझा वेब टीम | 01 Feb 2017 08:18 AM (IST)
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारचा हा चौथा अर्थसंकल्प असेल. सर्वसामान्य जनतेला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत, कारण नोटाबंदीनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे अर्थमंत्री अरुण जेटली जनतेला काय देणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. परंतु ई अहमद यांच्या निधनामुळे बजेट सादर होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणादरम्यान ई अहमद यांना हृदयविकाराचा झटका आला होता.ई अहमद यांना दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालायत दाखल करण्यात आलं होतं. परंतु रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.