कोकणातल्या आंबा आणि काजू पिकाला या पावसाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात गहू आणि द्राक्ष पिकाचं नुकसान होणार आहे.
आज मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण राहील. या भागात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे कापणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेऊ नये, असे आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलं आहे.