छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मुंबई आंदोलनानंतर सरकराने तातडीने अध्यादेश काढता मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सोडवला असल्याचा दावा केला जात आहे. तर, मराठा समाजाला याच मोठा फायदा होणार असून, आरक्षणाचा लढा यशस्वी झाला असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. दरम्यान, यावरच प्रतिक्रिया देतांना माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी मात्र, राज्य शासनाने मराठा समाजाची फसवणूक केली असल्याचं म्हटले आहे. तसेच, दिल्ली शिवाय आरक्षण शक्य नाही असेही जाधव म्हणाले आहेत. 


यावेळी बोलतांना जाधव म्हणाले की, "मराठा समाजाला अध्यादेश देऊन राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. अध्यादेश कायद्यामध्ये परिवर्तित करण्याच्या संबंधित भूमिका सहा महिन्याच्या नंतर किंवा अगोदर घेण्याच्या संदर्भात जो विषय आहे. त्यावर माझा राज्य शासनाला प्रश्न आहे, तुम्ही हे आंदोलन वाशीला पोहोचलं तेव्हा नाक दाबून तोंड उघडलं अशी परिस्थिती तुमची झाली. तुमचे इंटेन्शन क्लियर असते तर हे आंदोलन सुरू असताना विधानसभेचे लोकसभेचे सभागृह सुरू असताना या संबंधितीचा कायदा क्लिअर केला असता. पण तुम्ही तसं केलेलं नाही. म्हणून तुम्ही मराठा समाजाची फसवणूक केली आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही,” असे हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत. 


दिल्ली शिवाय आरक्षण शक्य नाही...


पुढे बोलतांना हर्षवर्धन जाधव म्हणाले की, "मराठा समाजाने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, सरकार एकीकडे ओबीसी समाजाचे आरक्षणाला हात लागू देणार नाही असे सांगते, दुसरीकडे मराठा समाजाला मात्र आरक्षण देऊ अशी भूमिका घेत अध्यादेश काढतायत. सरकार हे फक्त भांडण लावण्यामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे मराठा समाजाला जर आरक्षण हव असेल, तर ते दिल्लीतच करावं लागेल. त्या पलीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणे हे फक्त दिल्लीतच शक्य आहे. मराठा आरक्षण मिळेल असं मला वाटत नाही, म्हणून मी मराठा समाजाला आव्हान करतो की, ईतर समाजाला सोबत घेऊन दिल्ली काबीज करावी लागेल, तेव्हा आरक्षण मिळेल. नाहीतर हे फक्त भांडण लावण्याच्या पलीकडे काही होणार नाही,” असे आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले. 


फक्त विरोध म्हणून विरोध करु नका...


सरकारने काढलेल्या अध्यादेशावर होणाऱ्या टिकेबाबत बोलतांना मनोज जरांगे म्हणाले आहे की,“फक्त विरोध म्हणून विरोध करु नका. जेवढा विरोध होणार तेवढा हा कायदा मजबूत होणार आहे. काही लोकं जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. काहींच्या दुकानं बंद झाल्याने त्यांना याचा राग आहे. मात्र, मराठा समाजाच्या मुलांच्या ताटात माती कालवण्याचे काम करू नका असे आवाहन करत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


ईशा झा यांना ब्लॅकमेल केले जात आहे; हर्षवर्धन जाधवांचा दावा, सुरक्षा पुरवण्याची मागणी