छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील मुरमी येथे १८ वर्षीय तरुणीची अज्ञाताने घरात गळा चिरून हत्या (Chhatrapati Sambhajinagar Crime News) केल्याची घटना समोर आली होती. ही धक्कादायक घटना शुक्रवारी, ता १९ दुपारी उघडकीस आली. वैष्णवी संतोष नीळ, असे मयत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी ही वाळूज येथील साईनाथ महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकत होती.(Chhatrapati Sambhajinagar Crime News) वैष्णवी संतोष नीळ हिची शुक्रवारी धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या झाली होती. या घटनेचा एकाही प्रत्यक्ष साक्षीदार किंवा ठोस पुरावा उपलब्ध नसल्यामुळे आरोपीला शोधणं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं; याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासांत वाळूज पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. नानासाहेब कडूबा मोरे (वय २७, रा. मुरमी) असे आरोपीचे नाव छत्रपती संभाजीनगर : आहे.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुरमी येथील वैष्णवी ही वाळूजच्या एका महाविद्यालयात बारावीमध्ये शिकत होती. कॉलेज संपल्यानंतर शुक्रवारी दुपारी १२ वाजता ती घरी आली. यावेळी तिचे आई-वडील कामानिमित्त, बाहेर गेले होते, तर भाऊही शाळेत गेलेला होता. त्यामुळे वैष्णवी घरी एकटीच होती. हीच संधी साधून त्यांच्याच गल्लीत राहत असलेला आरोपी नानासाहेब मोरे तिच्या घरी आला व त्याने साडेतीन वाजेच्या सुमारास धारदार शस्त्राने वैष्णवीची गळा चिरून हत्या केली. यानंतर तो पसार झाला.
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बोलेगावातून घेतले ताब्यात
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चाडेचार तासांत शनिवारी पहाटे पोलिसांनी आरोपी नानासाहेब मोरे याचा शोध घेऊन अटक केली. एकाच गल्लीत राहणाऱ्या नानासाहेबसोबत तिचे मैत्रिपूर्णसंबंध होते; परंतु त्यांच्यात वाद वाढल्याने विकृत नानासाहेबने शुक्रवारी क्रूरपणे वैष्णवीची हत्या केली, या घटनेनंतर रात्री नेमका शेजारचा नानासाहेब घरी नसल्याचे पोलिसांना समजले व त्याचा शोध सुरू केला. गंगापूरमधील बोलेगाव येथे लपून बसलेला असताना पहाटे ३.३० ला पोलिसांनी त्याला अटक केली.आरोपी नानासाहेबने पोलिसांसमोर कबुली जबाब दिला. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
Chhatrapati Sambhajinagar Crime News: नेमकं काय घडलं होतं?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२:०० वाजता ती घरी आली. वैष्णवीचे वडील संतोष यादवराव नीळ हे दहेगाव-बिडकीन मार्गावर असलेली पानटपरी चालविण्यासाठी गेले होते, तर आई मथुरा शेतात कामाला गेलेली होती. वैष्णवीचा भाऊ प्रीतेष हा सकाळी शाळेत गेलेला होता. दरम्यान, महाविद्यालयातून आलेली वैष्णवी घरात एकटीच होती. दुपारी संतोष नीळ यांनी पत्नी मथुरा यांना फोन करून वैष्णवीला रक्ताच्या उलट्या होत असल्याचे सांगितले. तेव्हा मथुरा व इतर नातेवाइकांनी घरी धाव घेतली. तेव्हा त्यांना वैष्णवी खाटेजवळ रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत पडलेली आढळली. तिला तत्काळ बाहेर ओसरीत आणले असता ती मयत झालेली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून वैष्णवीचा मृतदेह रुग्णालयात हलविला. याप्रकरणी वैष्णवीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.