Solapur Flood Farmers Compensation: राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळची मोठी समस्या उद्भवली आहे. यात सर्वाधिक नुकसान हे एकट्या मराठवाड्याचा (Marathwada Flood) वाट्याला आले आहे. असताच या अस्मानी संकटात बळीराजा (Farmers Aide) हवालदिल झाला आहे. परिणामी आता पावसाने विश्रांती घेतल्याने परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अशातच आता शेतकरी, पूरग्रस्तांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार असून 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या महिन्याभरात पीक पाहणी होणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Continues below advertisement

राज्य आपत्कालीन परिस्थितीतून जात असल्याने 100 टक्के पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी हिताची काळजी घेऊन पाहणी करावी, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिले आहेत. दरम्यान, खरीप हंगाम 2025 साठी ही पीक पाहणी अतिशय महत्त्वाची असून शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची थेट बांधावर जाऊन चर्चा; (District Collector Kumar Ashirwad on Solapur Flood)

सोलापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराचा फटका बसलेल्या माढा आणि करमाळा तालुक्याचा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अचानक दौरा करत नागरिकांची थेट संवाद साधला. एका बाजूला महिला शिवसेना नेत्याला जागेवर खडसावणाऱ्या या डॅशिंग आयएस ऑफिसरने पूरग्रस्तांची मात्र त्यांचे समाधान होईपर्यंत पाहणी करत विविध प्रश्नांवर मार्ग (Maharashtra Flood Aide) काढला आहे. परिणामी नागरिकांनीही समाधान व्यक्त केलं आहे.

Continues below advertisement

पूरग्रस्तांनीही व्यक्त केले समाधान (Solapur Flood)

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी थेट बांधावर जाऊन करून कॅम्पमध्ये त्यांच्यासोबत मांडी घालून चर्चा केली. आजपासून शेतीच्या पंचनाम्याला सुरुवात केली जाणार असून आज प्रत्येकाच्या खात्यात दहा हजार रुपये आणि धान्य मिळायला सुरुवात होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. गावठाणामध्ये पहिल्यांदा वीज प्रवाह सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. चाऱ्याचे वाटप बहुतांश ठिकाणी झाल्याने आता तातडीच्या सर्व अडचणी संपल्या का असा प्रश्न विचारताच पूरग्रस्तांनीही समाधान व्यक्त केले.

दरम्यान, ज्या ठिकाणी पाणी आहे ते पाणी ओसरता उरलेले पंचनामे पूर्ण केले जातील, असे सांगताना ज्या ठिकाणी पडझड झाली आहे तेथे आजपासून जेसीबी व इतर यंत्रणा देऊन साफसफाई केली जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

पुराच्या वेळेला प्रशासनाकडून खूप चांगली मदत झाल्याचे प्रमाणपत्र ही ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांचे समोर दिल्याने तहसीलदार आणि प्रांताधिकार्‍यांच्या कामाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. करमाळा येथील महिला तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि महिला प्रांताधिकारी आव्हाड यांनी महिला असूनही आमची खूप मदत केल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

जागेवर प्रश्न सुटल्याने पूरग्रस्तांना मोठा दिलासा (Solapur Flood Farmers Aide)

जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक सुरू केलेल्या या दौऱ्यामुळे पूरग्रस्तांच्या नेमक्या अडचणी समजून घेऊन त्यातून तातडीने मार्ग निघू शकला. एका बाजूला राजकीय नेते मंत्री यांचे पूर टुरिझम सुरू असताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मात्र जागेवर प्रश्न सोडवत पूरग्रस्तांना मोठा दिलासा दिला. त्यामुळेच सलग दोन वेळा आलेल्या महापुरामुळे व्यथित झालेल्या आणि वैतागलेल्या पूरग्रस्तांना भेटायला आलेल्या अनेक नेत्यांना या बाधितांच्या संतापाचा सामना करावा लागला होता. मात्र आशीर्वाद यांनी कोणताही बडेजावपणा न करता थेट पूरग्रस्तांना विश्वासात घेतल्याने त्यांना बाधितानी आपल्या अडचणी मोकळेपणाने सांगितल्या आणि सोडवून देखील घेतल्या.

आणखी वाचा