चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील कापणगाव येथे ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षामधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. प्रकाश मेश्राम (ऑटो चालक, 48/पाचगाव), रवींद्र बोबडे (48/पाचगाव), शंकर पिपरे (50/कोची), तनु पिंपळकर (16/पाचगाव), ताराबाई पप्पूलवार (50/पाचगाव) आणि वर्षा मांदाडे (50/खामोना) अशी मृतांची नावे आहेत. तर गंभीर जखमी असलेल्या तीन जणांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. एक प्रवासी किरकोळ जखमी असून त्याच्यावर राजुरा येथे उपचार सुरू आहेत.
ट्रक हा राजुऱ्याकडून खामोना-पाचगाव येथे जात होता, तर रिक्षा गडचांदूर येथून राजुऱ्याकडे येत होती. कापणगाव येथे सर्विस रोड वरून हायवे वर रिक्षा येताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. यामध्ये रिक्षा चालक प्रकाश मेश्राम याच्यासह तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. याचवेळी इथून जात असलेले राजुर मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी तातडीने अपघातग्रस्तांना मदत दिली.
कल्याणमध्ये ट्रकची धडकेत महिलेचा जागीच मृत्यू
कल्याणच्या निक्कीनगर परिसरात 23 ऑगस्ट रोजी भीषण अपघात झाला. आपल्या मुलाला शाळेत सोडून परतणाऱ्या दुचाकीस्वार महिलेला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक फरार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर कल्याण खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्याच्या विविध भागात सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अपघात घडण्याची विविध कारणे आहेत. गाड्यांचा वेग, मद्यपान, रस्त्यांची अवस्था अशी विविध कारणांनी अपघात घडतात.
ही बातमी वाचा: