Continues below advertisement

Continues below advertisement

Bacchu Kadu: मुख्यमंत्र्यांना जर शेतकऱ्यांची काळजी असेल तर त्यांनी प्रतिनिधी पाठवावे

शेतकरी कर्जमाफीच्या (Farmer Loan Waiver) मागणीसाठी आक्रमक झालेले आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचा महा एल्गार मोर्चा (Maha Elgar Morcha) आज अमरावतीहून नागपूरमध्ये दाखल होणार आहे. 'मुख्यमंत्र्यांना जर शेतकऱ्यांची काळजी असेल तर त्यांनी चर्चा करुन प्रतिनिधी पाठवावे,' अशी थेट प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे. दरम्यान, बच्चू कडूंच्या आंदोलनाची सरकारने गंभीर दखल घेतली असून, आज सकाळी साडेदहा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीला आपण उपस्थित राहणार नसल्याचे बच्चू कडूंनी स्पष्ट केले आहे. यापूर्वीही सरकारने बैठका घेतल्या, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही, असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. जोपर्यंत कर्जमाफीचा ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत नागपूर सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Farmer Loan Waiver : रोजचं मरण मेल्यापेक्षा एक दिवसचा मरण मरायला आम्ही तयार

'रोजचं मरण मेल्यापेक्षा एक दिवसचा मरण मरायला आम्ही तयार आहे,' अशी संतप्त भावना मोर्चातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर संपूर्ण कर्जमाफी (Loan Waiver), शेतमालाला हमीभाव (MSP) आणि नाफेडमार्फत (NAFED) सोयाबीन खरेदी सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. पावसातही न डगमगता, 15 दिवसांचा अन्नधान्याचा साठा सोबत घेऊन शेतकरी या 'आरपार'च्या लढाईसाठी सज्ज झाले आहेत.

आणखी वाचा