औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याकरता सर्व प्रकारची सार्वजनिक वाहने चालवताना वाहन चालकाने मास्क घालून वाहन चालवणे बंधनकारक असणार आहे. सदरील नियमाचे पालन न करणाऱ्या परवाना धारकांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी) संजय मेत्रेवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विना मास्क सार्वजनिक वाहतूक करत असलेल्या वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याबाबत संबंधितांना सूचित केले. सदरील नियमांचे पालन न करणाऱ्या विना मास्क वाहन चालवणाऱ्या परवाना धारकाविरुद्ध प्रथम गुन्ह्याकरीता (30) दिवस तर दुसऱ्या गुन्ह्याकरीता (90) दिवस परवाना निलंबन होईल तर तिसऱ्या गुन्ह्याकरीता वाहनाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.


मुंबईत विना मास्‍क आढळल्यास आता महापालिकेसोबतच पोलिसही करणार कठोर कारवाई


तसेच केंद्र शासनाने वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र, सर्व प्रकारचे परवाने, शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्राचे नुतनीकरण, तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्रांची मुदत 1 फेब्रुवारी 2020 नंतर लॉकडॉऊन कालावधीमध्ये संपुष्टात आली असेल, अशा वाहनविषयक दस्ताऐवजांची वैधता 31 डिसेंबर 2020 पर्यत वाढवलेली आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन प्राधीकरण औरंगाबाद यांनी परवाना धारकांच्या परवाना नुतनीकरणाची ,बदली वाहन आदेशाची, इरादा पत्राची मुदत अशा वाहनविषयक दस्ताऐवजांच्या वैधतेस केंदशासनाकडून निर्देशित करण्यात आलेल्या 31 डिसेंबर 2020 या दिनांकापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.





COVID-19 RT-PCR Test | आरटी पीसीआर किटमार्फत कोविड टेस्ट कशी केली जाते?