Prajakt Tanpure on Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांच्या वीज बिल वसुलीविरोधात राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) चांगलेच आक्रमक झाले आहेत. वीज बिल वसुलीविरोधात तनपुरे यांनी पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील मिरी येथील महावितरणाच्या उपकेंद्रावर धरणे आंदोलन सुरू केलं आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून देखील अधिकारी धरणे आंदोलनस्थळी आले नसल्यानं आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझ्या परवानगीशिवाय कोणत्याही बैठकीला जायचे नाही अशा सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचा आरोप प्राजक्त तनपुरेंनी केलाय.


महावितरणकडून जुलमी पद्धतीनं शेती पंपाची वीज बिल वसुली  केली जात आहे. याविरोधात याविरोधात राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील महावितरणाच्या उपकेंद्रावर धरणे आंदोलन सुरु केलं आहे. पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज रोहित्र सरसकट बंद केले जात आहेत. त्यांना कोणतीही पूर्व सूचना दिली जात नाही. अधिकाऱ्यांना विचारणा केली तर उडवा-उडवीचे उत्तरं दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. महाविरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून देखील अधिकारी धरणे आंदोलनस्थळी आले नसल्यानं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे चांगलेच संतापले.


नेमकं काय म्हणाले प्राजक्त तनपुरे


राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं नाही. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक त्यामुळं वाया गेली आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता वीज बिल वसुली सुरु आहे. काही ठिकाणी डीपी बंद केले असल्याचे प्राजक्त तनपुरे म्हणाले. काही दिवसापूर्वी जे लोक म्हणत होते वीज बिल वसुल करु नका आज तेच लोक शेतकऱ्यांचे डीपी बंद करण्याचे काम सुरु असल्याचे ते म्हणाले.  


जुलमी पद्धतीन वीज बिल वसुली सुरु


आज राज्यात कोणत्या नवीन योजना नाहीत. बिल भरा नाहीतर डीपी बंद केले जाणार अशी जुलमी पद्धत सुरु असल्याचे तनपुरे यावेळी म्हणाले. सध्या शेतकऱ्यांच्या भावना या तीव्र आहेत. अहमदनगर जिह्ल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना परवानगिशीवाय कुठेही जाऊ नये अशा सूचना दिल्याचा आरोप तनपुरे यांनी केला आहे.  शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन सुरु केले असल्याचे तनपुरे यावेळी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


वीज बिल थकलं की शेतकऱ्यांचं कनेक्शन कट मात्र नेत्यांकडे लाखोंची थकबाकी; आकडे पाहून थक्क व्हाल