Ayurved News: पतंजली आयुर्वेद कंपनीच्या दाव्यानुसार त्यांच्या भारतीय नागरिकांमध्ये स्थान मिळवलं आहे. सध्या अनेक लोक रासायनिक उत्पादनांऐवजी नैसर्गिक आणि समग्र आरोग्य उपचारांच्या दिशेनं जात असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. पतंजलीची उत्पादन आणि वेलनेस प्रोग्रॅम लोकांच्या जीवनात बदल करत आहे.
कंपनीच्या दाव्यानुसार पतंजलीच्या यशाचं गुपित त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता आणि नैसर्गिक सामग्रीत आहे. लोकांनी पंतजलीच्या एलोवेरा जेल वापरलं आणि ते लवकरच या उत्पादनांचे प्रशंसक बनले. लोकांनी म्हटलं की ते जेल त्यांच्या त्वचेसाठी रासायनिक उत्पादनांपेक्षा गुणवत्तापूर्ण असल्याचं सिद्ध झालं.
याप्रमाणेच लोकांनी पतंजलीच्या दंत कांती टुथपेस्टचा उपयोग सुरु केला. यामुळं त्यांच्या हिरड्यांच्या समस्येत सुधारणा झाली. यावरुन हे दिसून येतं की पंतजलीची उत्पादनं केवळ प्रभावी नाहीत तर लोकांचा विश्वास देखील संपादन करत आहेत.
पंचकर्म आणि नेचरोपॅथीमुळं फायदा
कंपनीनं म्हटलं की पंतजली वेलनेस सेंटरद्वारे लोकांना आयुर्वेदिक उपचार, योग आणि नैसर्गिक उपचार पद्धतींच्या माध्यमातून आरोग्यसेवा दिली जात आहे. पंचकर्म आणि नेचरोपॅथी सारख्या पद्धतीद्वारे शरीराला डिटॉक्स करणे आणि मानसिक शांती देण्यामध्ये मदत करत आहेत. उदाहरणासाठी हायड्रोथेरपी आणि मड थेरपी सारख्या पद्धतींद्वारे लोकांचा तणाव कमी करणे आणि जुन्या आजारांपासून दिलासा मिळाला आहे. पतंजली योग आणि ध्यान सत्राच्या माध्यमातून लोकांना शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यात मदत केली आहे.
पतंजलीच्या दाव्यानुसार त्यांच्या दुकानांमध्ये आयुर्वेदिक डॉक्टर मोफत सल्ला देतात. जे ग्राहकांच्या स्थितीनुसार उत्पादनांचा सल्ला देतात. हा दृष्टिकोन ग्राहकांच्यामध्ये विश्वास निर्माण करत आहेत आणि आयुर्वेदाला लोकप्रिय करत आहेत. केश कांति शाम्पू, गुलाब सरबत असो किंवा च्यवनप्राश ही उत्पादनं भारतीय परंपरांच्यावर आधारित आहेत आणि आधुनिक गरजांना पूर्तता करत आहेत.
संतुलित जीवनशैलीसाठी आयुर्वेदाचं प्रोत्साहन
पतंजलीच्या या गोष्टींमधून हे स्पष्ट होतं की आयुर्वेद आणि नैसर्गिक उपचार केवळ आजारांशी लढण्यास मदत करत आहेत. याशिवाय एक आरोग्य आणि संतुलित जीवनशैलीला प्रोत्साहन दिलं जातं आहे. जसे जसे लोकांकडून प्राकृतिक उत्पदानांचा वापर वाढेल तसं पतंजलीचं आयुर्वेदातील योगदान वैश्विक स्तरावर ओळख देण्यात महत्त्वाचं आहे.