मध्यस्थ समितीकडून सुप्रीम कोर्टात अहवाल सादर, सुन्नी वक्फ बोर्डाची इतर ठिकाणी जाण्याची तयारी, वादग्रस्त जागेएवजी इतर ठिकाणी जाण्याची तयारी, सूत्रांची माहिती
अखिल भारतीय हिंदू महासभेने कोर्टात सादर केलेला नकाशा ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी फाडला, राजीव धवन हे मुस्लीम पक्षाचे वकील, तर विकास सिंह हे हिंदू महासभेचे वकील
सुनावणी सुरु होताच एका वकिलाने अधिकची मुदत मागितली. त्यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की, आज संध्याकाळी पाच वाजता अयोध्या प्रकरणाची सुनावणी संपेल. तर एका वकिलाचा हस्तक्षेपाचा अर्ज सरन्यायाधीशांनी फेटाळला.
सुनावणी सुरु होताच एका वकिलाने अधिकची मुदत मागितली. त्यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की, आज संध्याकाळी पाच वाजता अयोध्या प्रकरणाची सुनावणी संपेल. तर एका वकिलाचा हस्तक्षेपाचा अर्ज सरन्यायाधीशांनी फेटाळला.
सुप्रीम कोर्टात अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. सर्व पक्षकारांनी त्यांच्याकडील लिखित जबाब न्यायालयात सादर केले. आता फार झालं. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या प्रकरणातील सुनावणी पूर्ण होईल आणि हाच युक्तिवादाचा शेवट असेल, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सुनावणीला सुरुवात होताच स्पष्ट केलं.
पार्श्वभूमी
नवी दिल्ली : अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा बुधवार (16 ऑक्टोबर) शेवटचा दिवस असू शकतो, असे संकेत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिले आहेत. अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा काल (15 ऑक्टोबर) 39 वा दिवस होता. अयोध्या प्रकरणातील सर्व पक्षकारांनी आपला युक्तीवाद 16 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावा, असं सांगण्यात आलं आहे. अयोध्या प्रकरणाची सुनावणी अखेरच्या टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात 10 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
हिंदू महासभेचे वकील विष्णू जैन यांनी म्हटलं की, सर्व पक्षकार बुधवारी आपला युक्तीवाद पूर्ण करतील, अशी आशा आहे. त्यानंतर मोल्डिंग ऑफ रिलीफवर चर्चा होईल. मोल्डिंग ऑफ रिलीफवर चर्चा पूर्ण झाल्यास बुधवारीच निकाल सुरक्षित ठेवला जाईल. मात्र न्यायालय काय निश्चित करणार यावर सगळं अवलंबून आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून आज दोन्ही पक्षकारांना साडेतीन तासांचा अवधी देण्यात येईल. यामध्ये दोन्ही पक्षकारांना कोणत्या प्रकारचा दिलासा हवाय, हे विचारलं जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुनावणी पूर्ण होईल. हिंदू पक्षकारांना एक आणि मुस्लीम पक्षकारांना एक तास देण्यात येणार आहे. तर युक्तिवादासाठी दोन्ही पक्षकारांना 45-45 मिनिटं देण्यात येणार आहेत.
संवेदनशील खटला असल्याने अयोध्येत कलम 144 लागू करण्यात आलं आहे, तर 200 शाळा दोन महिने बंद राहणार आहेत. शिवाय वृत्तवाहिन्यांवरील चर्चांवरही बंदी घालण्यात आली आहे. अयोध्या प्रकरणाचा 17 नोव्हेंबरपूर्वी येण्याची शक्यता आहे. खटल्याची सुनावणी ज्या खंडपीठासमोर सुरु आहे, त्या खंडपीठाचे अध्यक्ष सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत.