Vaibhav Mangale Post On Suman Kalyanpur: आपल्या मधुर आणि सुश्राव्य आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला. भारतीय सिनेसृष्टीत 700 हून अधिक गाण्यांना त्यांनी आवाज दिला. वयाच्या 89 व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 

Continues below advertisement

मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट (Hindi Film) संगीतात त्यांनी दिलेले योगदान कधीही न विसरता येणारं आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारनं 2023 साली त्यांना 'पद्मभूषण' या नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. मराठी, बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा वेगवेगळ्या भाषांतील गाणी त्यांनी गायली. सुमनताईं लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि आशा भोसले (Asha Bhosle) यांच्याच काळात नावारुपाला आलेल्या. एवढ्या दिग्गज गायिका आधीच सिनेसृष्टीत काम करत असताना सुमनताईंनी आपल्या आवाजानं अनेकांची मनं जिंकली. अशातच मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी सुमन कल्याणपूर यांच्यासाठी एक पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये त्यांनी सुमनताईंचं एक अजरामर गीतही गायलं आहे. 

अभिनेते वैभव मांगले यांनी गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं साधर्म्य यावर भाष्य केलं आहे. तसेच, त्यांनी एक खंतही बोलून दाखवली आहे. सुरुवातीचा काही काळ सुमनताई लता बाईंसारखच गात होत्या… अनेक अशी उदाहरणं आहेत, ज्यात पटकन सांगता येत नाही की, लताबाई की सुमनताई गातायत, असं वैभव मांगले यांनी म्हटलंय. 

Continues below advertisement

अभिनेता वैभव मांगले नेमकं काय म्हणाले? (Vaibhav Mangale On Suman Kalyanpur)

मराठी अभिनेता वैभव मांगले यांनी दिग्गज गायिका सुमन कल्याणपूर यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये वैभव मांगलेनं लिहिलंय की, "ओठावरी विरला ग आसावला सूर' सुरुवातीचा काही काळ सुमन ताई लता बाईंसारखच गातं होत्या… अनेक अशी उदाहरणं आहेत, ज्यात पटकन सांगता येत नाही की, लताबाई की सुमनताई गातायत... एक द्वंद्व गीत आहे, ते तर कानात प्राण आणून ऐकलं तरीही सांगता येतं नाही… नेमकं कुणी काय गायलंय..."

"सुमनताई लता बाईंसारखं गातात हेच दुर्भाग्य होतं... साक्षात लताबाई असताना... सुमनताईंना कोण बोलवणार? याची सल त्यांना ही असणार, पण ताईंचं मोठे पण असं की, त्यांनी कधी हे कुठेही बोलून नाही दाखवलं… इतका सुज्ञपणा म्हणा किंवा दिलदारपणा म्हणा त्यांच्याजवळ नक्की होता… लताबाईंबरोबर त्याची मैत्री होती... त्यांचा आवाज लता बाईंसारखा जरूर होता... पण स्वर लगाव दोघींचे भिन्न होते... दमसास वेगळा होता...", असं वैभव मांगले म्हणालेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Vaibhav Mangle In Hindi Language Compilation: मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलीय; कशी? वैभव मांगलेंनी उदाहरणासह स्पष्टच सांगितलं

ABP माझाच्या बातम्या LIVE...