Marathi Serial Updates Sara Kahi Tichyasathi : छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीसाठी चांगलीच चढाओढ सुरू आहे. टीव्हीवर सुरू असलेल्या काही मालिकांच्या कथानकांमध्ये वळणं येत आहेत. मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांना खिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 'झी मराठी'वरील 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) या मालिकेतही मागील काही एपिसोडपासून कथानकात ट्वीस्ट आले आहेत. आता आणखी एक नवा ट्वीस्ट येणार आहे. ओवीवर प्राणघातक हल्ला कोणी केला हे आता प्रेक्षकांसमोर येणार आहे.


'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत काही दिवसांपूर्वी निशी आणि ओवी यांची लूटमार करण्याच्या हेतूने काही गुंड हल्ला करतात. यामध्ये निशीला वाचवताना ओवी गंभीर जखमी होते. ओवीवर रुग्णालयात उपचार सुरू असताना भावनाविवश झालेला श्रीनिवास तिच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली देतो. त्यातून  खोत कुटुंबात छोटसं वादळ आलंय. निशीचा जीव वाचवल्याबद्दल ओवीबद्दल खोत कुटुंबीयांमध्ये तिच्याबद्दल सहानुभूती आहे. तिच्यावर विविध कारणांनी असलेला राग निवळला आहे. ओवी-श्रीनूच्या लव्ह स्टोरीचा प्लॉट सुरू असताना आता दुसरीकडे मोठा ट्वीस्ट मालिकेत येणार आहे. 


ओवी-निशीवर झालेल्या हल्ल्यामागे कोणाचा कट होता का याची चर्चा प्रेक्षकांमध्ये होती. काहींना हा हल्ला खरंच चोरांनी केला असे वाटत होते. तर काहींनी मेघना आणि चारूवर संशय व्यक्त केला होता.


ओवी-निशीवर कोणी केला हल्ला?


'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत निशी आपल्या नवीन आयुष्यात रमायचा प्रयत्न करतेय. पण, त्यात आता दुसरीकडे ओवीच्या हल्ल्यामागे मेघना असल्याचे समोर येणार आहे. तो हल्ला निशीवर करायचा होता. पण, ओवीमध्ये आल्याने ती जखमी झाली. 


'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत आता  मेघनाचा चांगुलपणाचा रंग उतरणार आहे. निशीने काही ही केले तरी मी तिला मनापासून कधीच सून  म्हणून स्विकारणार नसल्याचे मेघनाने ठरवले आहे. फक्त नीरजच्या हट्टापोटी मेघनाने हे लग्न करून दिले आहे. निशीच्या गृहप्रवेशापासून तिच्यावर संकटाची मालिका सुरू झालेली आहे. या सगळ्यामागे मेघनाचा हात असल्याचे समोर येणार आहे.  मुंबईला जाण्याआधी ही मेघनाने निशीचा काटा काढण्याची पूर्ण तयारी केली  पण  ओवीमुळे तिचा कट फसला. 






मेघना टाकणार पुढचा डाव... 


मेघना आता निशीविरोधातील राहिलेले हे अर्धवट  काम पूर्ण करणार आहे. नीरज परत येईपर्यंत ती निशीची घरातून आणि नीरजच्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्नात असणार आहे. ज्याची सुरुवात  मेघनाने  हुशारीने सुरु केली आहे. निशी ओवीची काळजी घ्यायला जास्तीत जास्त वेळ  खोत घरात असते ज्याचा राग मेघनाला आहे. त्यातून आता मेघना पुढचा डाव टाकणार आहे. निशीला नीरजच्या आयुष्यातून बाहेर काढण्यात मेघना यशस्वी होईल का, नीरजला आपल्या आईचं खरं स्वरुप कळेल  का,  निशीच्या जीवाला काही धोका निर्माण होईल का? हे लवकरच प्रेक्षकांना आगामी काही एपिसोडमध्ये समजणार आहे.