Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath)  ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत यश आणि नेहाचं नातं बहरताना दिसत असले तरी परी यशचा बाबा म्हणून स्वीकार करणार की फ्रेंड म्हणून स्वीकार करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 


'माझी तुझी रेशीमगाठ'च्या आगामी भागात यश परीला भेटायला जाणार आहे. तेव्हा परी यशला म्हणताना दिसणार आहे,"मला तुझी आठवण येतचं होती". त्यामुळे नेहा आणि यश खूश होतात. दरम्यान परी बंडू काकांना म्हणते,"मला बाबा नको आहे. बाबा सोडून जातो".





नेहा आणि यशचे प्रेम फुलत असले तरी परी यशचा बाबा म्हणून स्वीकार करणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत अनेक रंजक वळणं येत आहेत. यश आणि नेहाने एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली असली, तरी परी यशचा स्वीकारेल का? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.