Kaun Banega Crorepati: छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती-14 (Kaun Banega Crorepati-14) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सीझनच्या एपिसोडमध्ये भारतातील वेगवेगळ्या भागामधील स्पर्धक सहभागी होतात. या सीझनचे सूत्रसंचालन अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे करतात.  या कार्यक्रमाचा 14 वा सिझन आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याबाबत अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये भावना व्यक्त केल्या होत्या. 


बिग बींनी ब्लॉगमध्ये व्यक्त केल्या भावना


अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं, 'केबीसी-14 प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. क्रू आणि कलाकारांना त्यांच्या रूटीनमध्ये अनुपस्थिती जाणवू शकते. पण आशा आहे की आपण सगळे पुन्हा एकत्र येऊ. लवकरच...'


'या कार्यक्रमाच्या एपिसोडमध्ये प्रतिष्ठित सेलिब्रिटी आणि व्यक्तिमत्त्वांनी भाग घेतला, ज्यांनी समाज आणि देशासाठी  उत्कृष्ट योगदान दिले आहे. त्यांच्यासोबत चर्चा करणे आणि त्यांचे विचार जाणून घेणे ही  सन्मानाची गोष्ट आहे.' असंही बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं. 


22 वर्ष कार्यक्रमानं केले प्रेक्षकांचे मनोरंजन 


केबीसीची सुरुवात 2000 साली झाली. या कार्यक्रमाचे 14 सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाच्या अनेक सीझनचे सूत्रसंचालन केलं आहे. बिग बी यांनी  केबीसीच्या 14 व्या सीझनचे देखील सुत्रसंचालन केले. या कार्यक्रमाची विविध सोशल मीडिया प्लॅटफॅार्मवर चर्चा होत असते. कार्यक्रमात अमिताभ बच्चन हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही किस्से त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करतात. तसेच विविध बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात. 


केबीसी सारख्या कार्यक्रमांसोबतच बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले. तसेच अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच अनुपम खेर, बोमन ईरानी, नीना गुप्ता, सारिका, परिणीती आणि डॅनी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. आता बिग बी हे प्रभासच्या नव्या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आागमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Kaun Banega Crorepati : संसाराच्या 50 वर्षानंतर Amitabh Bachchan यांनी सांगितलं Jaya Bachchan सोबत लग्न केल्याचं कारण; केबीसीच्या मंचावर खुलासा