Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar : 'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) मात्र कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत आहे. कधी घरातील सदस्यांची भांडणे, वाद-विवाद, तर कधी बिग बॉसने दिलेला टास्क या सर्व गोष्टींमुळे यंदाचा सीझन गाजतोय. दिवसागणिक, टास्कनंतर घरातील समीकरणांमध्येही बदल होताना दिसत आहेत. बुधवारी पार पडलेल्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये निक्की तांबोळीमुळे (Nikki Tamboli) आता वैभव चव्हाण (Vaibhav Chavan), अरबाज पटेल (Arbaz Patel) आणि  जान्हवी किल्लेकरच्या (Jahnavi Killekar) मैत्रीत फूट पडणार आहे. 'आता ह्याच्या पुढे मी तुमच्याविरोधात खेळणार' असल्याचे जान्हवीने वैभव, अरबाजला ठणकावले आहे.


 बिग बॉस मराठीच्या घरात पार पडलेला कॅप्टनसी टास्क सध्या चर्चेचा विषय बनला आहे.  बुधवारच्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये 'ग्रुप ए' कडून अरबाज पटेलने जान्हवीला कॅप्टनपदाच्या उमेदवारीतून बाद केले. याचा जान्हवीला धक्का बसला. तिच्याच मित्रांकडून तिला मोठा धक्का मिळाल्याने जान्हवी चांगलीच चिडलेली दिसून आली. 


बिग बॉसच्या प्रोमोमध्ये जान्हवी अरबाज आणि वैभवला विचारते की,"तुम्ही सेकंड राऊंडमधून मला कॅप्टसीमधून उडवलं?". त्यावर वैभव उत्तर देताना म्हणतो की,"निक्कीने तुला काढलं आहे". पुढे जान्हवी विचारते,"निक्कीला माझ्या कॅप्टनसीबद्दल काय प्रॉब्लेम आहे. मी एकटी खेळत असले तरी एक कुठेतरी मैत्री होती ना. यापुढे मी तुमच्या विरोधातच खेळणार आहे. आपण एकमेकांच्या विरोधाच खेळू" असे जान्हवी सांगताना दिसत आहे.






कॅप्टन्सीपदाच्या  टास्कमध्ये दुसऱ्या फेरीच्या आधी निक्की अरबाजला आर्या आणि जान्हवीला नॉमिनेट करण्यास सांगते. अरबाज सुरुवातीला जान्हवीच्या नावाला लटका विरोध करताना दिसतो. पण, अरबाजने निक्कीच्या सूचनेनुसार आर्या आणि जान्हवीला कॅप्टन्सीपदाच्या बाहेर काढतो. 


जान्हवीला झालंय दु:ख 


'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात जान्हवी आणि आर्या गप्पा मारताना दिसत आहे. जान्हवी आर्याकडे आपलं दु:ख व्यक्त करत आहे. जान्हवी म्हणतेय,"कॅप्टनसीसाठी मला बाद का केलं हे मला जाणून घ्यायचं होतं. निक्कीच्या डोक्याने चालत आहेत ते. टास्कमध्ये मी गेमचा विचार करत होते आणि त्यातच माझं नाव जाहीर झाल्याने मला मोठा धक्का बसला असल्याचे जान्हवी सांगते.