Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अशातच मालिकेत आता नवा ट्विस्ट आला आहे. अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचं सत्य यशसमोर आल्याने आता यश-नेहाच्या नात्यात दुरावा आला आहे. 


'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत रंजक ट्विस्ट येत असल्याने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. परी आणि यशच्या वाढदिवसाचं निमित्त साधत सिम्मी काकूने अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचं सत्य सर्वांना सांगितलं. त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 


नेहा जाणार चाळीत राहायला


नेहाने तिची चूक सर्वांसमोर कबुल केली आहे. पण नेहासोबत प्लॅसमधलं कोणीही बोलत नाही. त्यामुळे नेहा आता परीला घेऊन चाळीत राहायला जाणार आहे. परीसाठी तरी नेहाने चाळीत जाऊ नये म्हणून समीर यशची समजूत घातलण्याचा प्रयत्न करतो. पण यश मात्र समीरचं काहीही ऐकूण घेत नाही. त्यामुळे आता परीच्या मनावर परिणाम होऊ शकतो. 


परीच्या मनावर होणार परिणाम






यश-नेहाच्या नात्यात दुरावा आल्याने परीच्या मनावर याचा परिणाम होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. परीला तिचा खरा बाबा कोण हे समजल्यानंतर ती काय प्रतिक्रिया देईल याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. अविनाशमुळे परी आणि यशच्या नात्यात दुरावा येईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांच्या मालिकेच्या आगामी भागांत मिळतील. 


श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. 


संबंधित बातम्या


Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; अविनाशचं सत्य आलं यशसमोर


Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; अविनाशचं सत्य नेहा सांगणार यशला