Tanaji Galgunde on Live in Relationship :  काही वर्षांपूर्वी आलेल्या सैराट (Sairat) हा सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. या सिनेमातून भेटीला आलेले सगळे नवखे कलाकार त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके झाले. आर्ची, परश्या, सल्या आणि लंडग्या यांच्या भूमिकेत रिंकु राजगुरु (Rinku Rajguru), आकाश ठोसर (Aakash Thosar), तानाजी गळगुंडे आणि अरबाज शेख ही मंडळी प्रकाशझोतात आलीत. त्यानंतर त्यांच्या करिअरला देखील चांगलीच कलाटणी मिळाली. यातील लंगड्या म्हणजे अभिनेता तानाजी गळगुंडे याने नुकतच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याची लग्नाविषयीची मतं मांडली आहेत. 


तानाजी हा सैराटनंतर गस्त, झुंड, माझा अगडबम, फ्रिट हिट दणका, एकदम कडक आणि घर बंदूक बिरयानी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामधील त्याच्या भूमिकांनी प्रेक्षकांचीही मनं जिंकलीत. पण सध्या हा अभिनेता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे या अभिनेत्याने त्याची लग्नाविषयीची मतं मांडली आहे. त्यामुळे अनेकांनी त्याला ट्रोलही केलं आहे. 


तानाजीने काय म्हटलं?


तानाजीने नुकतीच आरपार ऑनलाईन या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने म्हटलं की, मला लग्न ही व्यवस्थाच पटत नाही. म्हणजे मी कदाचित आता खूप पुढे गेलो असेन पण मला आता पटतं ते लिव्ह इन रिलेशनशिप. एकतर ते लग्नाआधी बघायचं, त्या मुलीला आवडतोय की नाही माहित नाही आणि लग्न करायचं. सगळ्या लोकांनी एकत्र यायचं आणि एका दिवसासाठी का एवढं अवडंबर करायचा.


लिव्ह इन रिलेशनशिपच ग्रेट आहे - तानाजी


पुढे त्याने म्हटलं की, . तामजाम एवढा मोठा करायचा, 5-10 लाख रुपये खर्च करायचा. खर्च करुन वाजत गाजत वरात काढायची, नाचायचं बँड बाजा लावून. चांगली गोष्ट आहे, नाचू आपण पण एखादी छोटीशी पार्टी करावी, असं मला वाटतं. जर लग्न करायचंच आहे आता माझा विचार वेगळा आहे की मला लिव्ह इन रिलेशनशिप हे ग्रेट वाटतं. पण लग्न करायचं तर मग ते रजिस्टर करावं असं मला वाटतं. जास्त खर्च नाही, 2-4 हजारांत लग्न झालं, हार तुरे घातले बास झालं.                   


ही बातमी वाचा : 


Bai G marathi Movie : एकाच जन्मात नवरा बायकोला कंटाळतो पण..., वटपौर्णिमेच्या दिवशी 'बाई गं' सिनेमाचा टीझर रिलीज