Suraj Chavan:बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाण कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने बिग बॉसच्या सध्या सुरु असलेल्या पर्वाविषयी, त्याच्या वैयक्तिक संघर्षाविषयी अनेक खुलासे केले. काही महिन्यांपूर्वी त्याच्या लग्नाची चर्चा झालेली. त्याच्या मामाच्या मुलीशी लग्न करत त्याने धुमधडाक्यात लग्न केलं. पण नंतर त्याच्या लग्नात बिग बॉसमधील त्याच्या जवळचे म्हणवणारे लोकच आले नाहीत अशा चर्चा रंगल्या. सुरजच्या लग्नात त्याच्यासोबत दिसलेली जान्हवी किल्लेकरनेही काही दिवसांपूर्वी सुरजच्या लग्नातील इतर स्पर्धकांच्या अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त केलेली. आता सुरजही यावरून या मुलाखतीत बोललाय, त्याच्या या प्रतिक्रियेची सध्या चांगलीच चर्चा आहे.  

काय म्हणाला सुरज ?

बिग बॉसच्या घरात हा माझा भाऊ आहे, माझा मित्र आहे असं खूप जण म्हणाले पण सुरज च्या लग्नाला कोणी आलं नाही. यावर सुरज म्हणाला, " खरं बोललं तर यांना टोचेल. कुणाला वाईट बोलणार नाही. जवळचे होते, घरात होते. त्यांनी एक पाळायला पाहिजे होतं, गरीबाचे पोरगंय, त्याच्या लग्नाला फॅन्सच्या अपेक्षा असतील. माझी कसलीही अपेक्षा नव्हती. आमच्या सुरज दादासाठी सगळे येतील अशी माझ्या फॅन्सची अपेक्षा होती. "  

तो पुढे म्हणाला, " मोठ्या सेलिब्रिटींच्या लग्नाला कोणी गेलं नाही. पण सुरज चव्हाणचे लग्न सगळ्यात मोठं झालं. कारण महाराष्ट्राचे जनता लई प्रेम करते. कोणी नाही आलं तरी माझ्यासाठी महाराष्ट्र आहे. माझे आई बाप आहेत. तेच माझ्यासाठी होते. कोणी आलं नाही म्हणून काही वाईट वाटून घ्यायचं नाही. आपला देव घडवून आणतो आपल्याला. आपल्याला यांनी बनवलं नाही.  आपल्याला देवाने जन्म दिलाय. जाईने पोटात वाढवलं त्या आईची माया भेटली आहे. बाकी कोणी नाही. वाईट माणसं असतात. त्यांना काही करता येत नाही. आपण आपले विचार चांगले ठेवायचे. " असं सुरज म्हणाला.

सुरज चव्हाण सोशल मीडियात (Social media) प्रचंड सक्रीय असतो. त्याच्या प्रत्येक व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळतात. सुरज चव्हाणला खरी ओळख बिग बॉस मराठी सिझन 5 मधून विशेष मिळाली. त्यानं आपल्या सोज्वळ आणि प्रेमळ स्वभावातून प्रेक्षकांची मने जिंकली. 

हेही वाचा:

Suraj Chavan: 'माझ्याकडे दैवी शक्ती, मरी आई माता मला..'; सुरज चव्हाणने सांगितला सुरुवातीचा काळ, पहिला डायलॉग कोणता?