South Cinema why did gracy singh leave bollywood : लगान हा सिनेमा आमिर खानच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे, ज्याला प्रत्येक वर्गातील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. असं असलं तरी, आज आपण या चित्रपटातील नायिकेबद्दल बोलणार आहोत, जिने आपल्या अभिनयाने चित्रपटाला आणखी दमदार बनवलं होतं. तुम्हाला माहिती आहे का, आमिरची ती गौरी आता कुठे आहे आणि कशी दिसते? ग्रेसी सिंह या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी आमिर खान, अजय देवगण, संजय दत्त आणि अमिताभ बच्चन यांसारख्या अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. त्यांच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये लगान, मुन्ना भाई एमबीबीएस आणि गंगाजल यांचा समावेश होतो.

Continues below advertisement

आमिर आणि ग्रेसी सिंहचा लगान हा चित्रपट 2001 साली ऑस्करसाठी नामांकन मिळवून गेला होता. तरीदेखील, त्या हळूहळू इंडस्ट्रीमधून गायब झाल्या. आज आपण जाणून घेऊ की, यशस्वी करिअर घडवण्याऐवजी त्या का लाईमलाइटपासून दूर गेल्या. सांगायचं झालं तर लगानच्या काळात ग्रेसी सिंह वयाच्या 20-21 वर्षांच्या होत्या आणि आता त्या 44 वर्षांच्या झाल्या आहेत. मात्र, 44 वर्षांच्याही वयात त्या खूप आकर्षक दिसतात. ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर जाऊन ग्रेसीने द प्लॅनेट्स या डान्स ग्रुपसोबत टूर करत नृत्यकला क्षेत्रात करिअर सुरू केलं. त्यांनी 1997 मध्ये अमानत या दूरदर्शन मालिकेतून अभिनयाची सुरुवात केली होती. पण त्यांना खरी ओळख मिळाली लगान: वन्स अपॉन ए टाइम इन इंडिया या ऐतिहासिक क्रीडा-नाटक चित्रपटातून.

लगान हा चित्रपट आशुतोष गोवारीकर यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला होता, तर आमिर खानने सिनेमाची निर्मिती केली होती. या चित्रपटात ग्रेसीने आपल्या साधेपणाने आणि निरागसतेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. हा चित्रपट प्रचंड हिट ठरला आणि मदर इंडिया आणि सलाम बॉम्बेनंतर सर्वोत्तम परदेशी भाषेच्या श्रेणीत ऑस्करसाठी नामांकन मिळवणारा तिसरा भारतीय चित्रपट ठरला. ग्रेसी सिंह यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. मात्र, त्या आपलं यश टिकवून ठेवू शकल्या नाहीत. त्यांनी अनिल कपूर आणि अमिताभ बच्चनसोबत अरमान चित्रपट केला, पण तो फ्लॉप ठरला. त्यानंतर त्यांनी चंचल, देशद्रोही आणि देख भाई देख सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं, परंतु हे चित्रपट प्रेक्षकांना भावले नाहीत आणि बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.

Continues below advertisement

बॉलिवूडमध्ये सतत अपयश आल्यानंतर ग्रेसीने तमिळ, तेलुगू, मल्याळम, गुजराती, पंजाबी आणि बंगाली चित्रपटांत काम करण्यास सुरुवात केली. पण तिथेही त्या फार टिकू शकल्या नाहीत. अखेर 2013 साली त्यांनी ब्रह्मकुमारी विश्व आध्यात्मिक विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी तिथल्या नियमांचं पूर्ण पालन करायला सुरुवात केली आणि त्यांच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. ब्रह्माकुमारीत सहभागी झाल्यानंतर ग्रेसी सिंह यांनी एका पोर्टलला दिलेल्या जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं – "मला येथे  सुरक्षा, शांती, आनंद, समज, स्वीकार आणि सहकार्याचा अनुभव आला. मी येथे (ब्रह्मकुमारी विश्व आध्यात्मिक विद्यापीठात) जगभरातील विनम्र, दयाळू आणि समजूतदार लोकांना भेटले."

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अभिनेत्रीवर अत्याचार केल्याप्रकरणी अभिनेत्याला अटक, पोलिसांसमोर विष पिल्याचं नाटकही केलं, पण आता मुसक्या आवळल्या