Sharad Ponkshe on King Akbar: मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad  Ponkshe)कायम त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नांदेडमध्ये एका कार्यक्रमात केलेल्या त्यांच्या वक्तव्याची सध्या  चर्चा आहे. 'मुगल - ए - आझम चित्रपटात अकबर किती सेक्युलर होत आहे, दाखवायला इतिहासात अस्तित्वात नसलेलं जोधा नावाचं पात्र घुसवलं. एक लाख अशोक खरात (Ashok Kharat) एकत्र केले तर एक अकबर होईल', असं वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलंय. नांदेडमध्ये परशुराम तेजोत्सव व्याख्यानमालेत अभिनेते ते बोलत होते. या कार्यक्रमात अनेक विषयावर त्यांनी भाष्य केलंय. 

Continues below advertisement

ते म्हणाले 'जात हा विषय नव्हता. संस्कृतीशी त्याचा संबंध नव्हता. याची सुरुवात मुस्लिम आक्रमणापासून झाली. याला जबाबदार ब्रिटिशशाही आहे. असंही ते म्हणाले. हिंदू कधी रस्त्यावर उतरत नाही त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला जवळ का करायचे?' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

नेमकं काय म्हणाले शरद पोंक्षे?

नांदेडमधील परशुराम तेजोत्सव व्याख्यानमालेत बोलताना ते म्हणाले, 'हिंदुत्वाची वज्रमूठ काँग्रेसने फोडून टाकली. आता सगळ्या जाती, आम्ही हिंदू नाही असं सांगत आहेत. पद्धतशीर हे किडे सोडले आणि मुळापर्यंत जाऊन पोहचले. हिंदुत्व कोण्या ग्रंथासोबत बांधले गेले नाही. आमचा धर्म ग्रंथ एक 'हे विश्वची माझे घर' हे ब्रीद वाक्य आहे.धर्माच्या नावावर काही मिळत नाही वेगळं. मग मंदिरांवरच सरकारचा कंट्रोल का आहे? मंदिरांचा पैसा सरकारी तिजोरीत का जातो?चर्चेमधील सगळा पैसा ख्रिश्चन, मशीदीचा पैसा कंट्रोल नाही. असं पोंक्षे म्हणाले.

Continues below advertisement

"हिंदू रस्तावर उतरत नाही, त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला का जवळ करायचे?"

"हिंदू कधी रस्त्यावर उतरत नाही, त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला का जवळ करायचे असा प्रश्न शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला. सेक्युलर म्हणता, तर सरकारी पैसा हिंदू मंदिरातून का जातो? 4 लाख हिंदू मंदिरातून पैसा सरकारी तिजोरीत जातो. मदरसे चर्चमधून का जात नाही? या पैशातुन मुस्लिम ख्रिश्चन लोकांचे सुद्धा कल्याण होते. 80 टक्के हिंदू या साठी का उरत नाही रस्त्यावर?" असं ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, "ब्राम्हणांची हत्या करणारा टिपू सुलतानची सिरीयल दूरदर्शनवर प्रसारित करुन तो किती चांगला होता हे आमच्या बोडक्यावर काँग्रेसने त्याची सिरीयल दूरदर्शन वर दाखवली." असंही पोंक्षे यांनी म्हटलं.

बाजीराव पेशव्यांवर सिरीयल येत नाही..

"अटक पासून कटकपर्यंत ज्यांनी स्वराज्यचे स्वप्न पाहिले त्याचे साम्राज्य पूर्ण केले ते बाजीराव पेशवा त्याचा इतिहास माहिती नाही. त्यांचा सिरीयल येत नाही. त्याचा चुकीचा इतिहास आणला. 41 लढाई कसं लढला, हे सुद्धा दाखवले जात नाही. फक्त 17 महिने मस्तानी त्याचा आयुष्यात आली तिला पत्नीचा दर्जा दिला होता," असे पोंक्षे म्हणाले.

 1 लाख खरात केला तर 1 अकबर तयार होईल 

'मुगल ए आझम' चित्रपटातील अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी इतिहासातील अस्तिवत नसलेल्या पात्र दाखवण्यात आले. अकबर कसं चांगला असेल बायकांचे आयुष्य बरबाद करणारा होता 1 लाख खरात एकत्र केले तर एक अकबर तयार होईल." असे पोंक्षे म्हणाले.