Sanjay Mishra father death emotional story: गोलमाल, मसान, आँखो देखी, या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे संजय मिश्रा, आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही तितकेच चर्चेत असतात. त्यांनी आपल्या स्ट्रलिंगच्या काळात बरेच चढ उतार पाहिले आहेत.  त्यांनी अनेक मुलाखतीतून आपले स्ट्रगल आणि वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी, कसे मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले,   काही दिवसांत  वडिलांचा नेमका कसा मृत्यू झाला, याबाबत माहिती दिली.  संजय मिश्रा त्या धक्क्यातून कधीच सावरू शकले नाहीत.  त्यांनी अलिकडेच एका पॉडकास्टमध्ये वडिलांना गमावल्यामुळे झालेल्या दु:खाबद्दल माहिती दिली. त्यांनी पत्नी किरण आणि लग्नाबाबतही खुलासा केला. ते क्वचितच मुलाखतीत आपल्या  वैयक्तिक आयुष्याबाबत बोलतात. पण या पॉडकास्टमध्ये त्यांनी उघडपणे सर्व सांगितलं.

Continues below advertisement

संजय मिश्रा यांनी उत्तराखंडच्या  रहिवासी असलेल्या किरणशी विवाह केला होता.  त्यांनी अरेंज्ड मॅरेज केले होते. सुरूवातीला त्यांना जुळवून घेताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता, असं  त्यांनी पॉडकास्टमध्ये सांगितलं. संजय मिश्रा म्हणाले, "पत्नी केवळ दोन मुलांचीच नाही तर, संपूर्ण घराचीही काळजी घेते.  जेव्हा माझं किरणसोबत लग्न झालं होतं, तेव्हा मला माझा मित्र सौरभ शुक्लाने घरात भाडेकरूसारखं राहण्यास सांगितलं होतं. यामुळे मी माझ्या घरात भाडेकरू प्रमाणे राहू लागलो.  मला किरणसोबत जुळवून घेताना थोड्या अडचणींचा सामना करावा लागला होता",  असं संजय मिश्रा म्हणाले.

वडिलांच्या मृत्यूबाबत संजय मिश्रा म्हणाले, "त्या दिवशी सासरे अचानक घरी आले होते. तेव्हा मी ड्रायव्हरसोबत दारू पित होतो. मी तेव्हा माझ्या ड्रायव्हरला म्हणालो  की, मला वडिलांच्या अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी घेऊन जा. मी गेलो. घाटावर चिता जळत होती. त्या चितेतील राख  मी शरीरावर लावली,  नंतर वडिलांना हाक मारली. मी खूप रडलो. अंगावर राख लावलेली असताना,  काहींनी स्मशानभूमीतच माझ्याजवळ येऊन फोटो काढले", असं संजय मिश्रा म्हणाले.

Continues below advertisement

"काही वेळानंतर मी माझ्या घरी गेलो. त्यावेळेस मी  पांढऱ्या रंगाचा पँट शर्ट घातला होता. माझ्या अंगावर आणि केसांवरही राख होती.  माझ्या सासऱ्यांनी  मला पाहिलं, नंतर त्यांना त्यांच्या मुलीचे स्वप्न दिसले. ड्रायव्हरने माझ्या अंगावर तिथेच पाणी ओतलं. तसेच आंघोळ घातली.  तेव्हा सासऱ्यांनी मला विचारले की, कुठून येत आहे, तेव्हा त्यांना, 'अरे त्याच्याबद्दल विचारू नका.  ते त्याच ठिकाणाहून येत आहे, जिथे त्यांच्या वडिलांचे निधन झाले', असं उत्तर त्यांना उत्तर देण्यात आले.