Richa Chadha Supports Cockroach Janata Party Protest: सोशल मीडियात (Social Media) सध्या कॉकरोच जनता पार्टीची (Cockroach Janta Party) जोरदार चर्चा सुरू आहे.   आज शुक्रवारी, 6 जून रोजी त्यांनी जंतर - मंतर (Jantar Mantar) येथे शांततापूर्ण आंदोलन आयोजित केले आहे.  या आंदोलनासाठी त्यांना दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) परवानगी मिळाली आहे.   या आंदोलनात  केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या  राजीनाम्याची मागणी केली जाईल.  दरम्यान, मनोरंजन क्षेत्रातील कलाकारही या आंदोलनात देशातील तरुणांच्या  पाठीशी उभे आहेत. अभिनेत्री रिचा चड्ढानेही (Richa Chadha) आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.  अभिनेत्रीने (Entertainment) यासंबंधित एक पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे.  

Continues below advertisement

अभिनेत्री ऋचा चड्ढाचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा (Richa Chadha supports Cockroach Janata Party protest Shares Post)

बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढाने सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करुन कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा दर्शवला आहे.  अभिनेत्रीने पोस्टमध्ये म्हटलं की, 'मी आता सुंदर अशा ऑकलँड या जागेवर आहे.  येथे कदाचित जगातील सर्वात स्वच्छ हवा आहे. पण माझं मन अजूनही दिल्लीमध्ये अडकलंय. माझी प्रिय दिल्ली- माझ्या बाळपणीचे, शाळेचे आणि कॉलेजचे शहर...  जिथे मोठे-मोठे पार्क आणि जुने झाडी आहेत. मी माझ्या देशातील तरुणांना माझे प्रेम पाठवते'.

'मला आशा आहे की, तुम्ही बेगडी देशभक्त होण्यापेक्षा  खरे देशभक्त व्हाल.  तुम्ही दयाळू, शांत आणि समजूतदार व्हा. मी मनापासून तुमच्यासोबत आहे', असं अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.  सध्या ऋचा चड्ढाची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

Continues below advertisement

अतुल कुलकर्णींनी का मागितली माफी? (Atul Kulkarni apology message for youth)

 

अभिनेता अतुल कुलकर्णी यांनीही कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सर्व तरुणांना सहभागी होण्याच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे.  अभिनेत्याने पोस्ट शेअर करुन माफीही मागितली आहे.  अभिनेत्याने पोस्टमध्ये म्हटलं की, 'प्रिय तरुण नागरिकांनो... जसं तुम्ही तुमचा आवाज उठवण्यासाठी आणि तुमचे निर्णय महत्त्वपूर्ण ठरवण्यासाठी सज्ज होत आहात, मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. माझ्या पिढीने, आधीच्या आणि नंतरच्या पिढीने कधीही आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली नाही'.

'आमच्याकडून चुका झाल्या आहेत.  आम्ही आमच्या वाट्यातील आव्हाने मागे सोडली आहेत, जी आता तुमच्या वाट्याला आली आहेत. यासाठी आता मी माफी मागतो.  तुम्ही प्रामाणिकपणे देशाला आकार देत राहा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा', असं अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

वरुण, मृणाल अन् पूजा यांची धमाल, 'है जवानी तो इश्क होना है' मध्ये कॉमेडी, ड्रामा अन् रोमान्सचा फुल्ल डोस