Marathi Actor Dada Kondke Death Story: मराठी सिनेसृष्टीचा (Marathi Movie) एक काळ असा होता की, त्यावेळी बॉलिवूडपेक्षाही दर्जेदार आणि हिट सिनेमे मराठीत (Marathi Movie) बनत होते. मराठी सिनेसृष्टीत अनेक दिग्गज होऊन गेले. ज्यांनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे प्रयोग केले. एकापेक्षा एक असे हिट सिनेमे दिले. याच दिग्गजांपैकी एक नाव म्हणजे, दादा कोंडके (Dada Kondke). 'पांडू हवालदार', 'सोंगाड्या', 'येऊ का घरात' यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये दादा कोंडकेंनी स्वतः काम केलं आणि प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मराठी सिनेसृष्टीतला एक सोनेरी काळ दादांच्या नावानं ओळखला जातो. दादांचा सिनेमा लागला की, थिएटर हाऊसफुल्ल व्हायचे. कधीकाळी 40 आठवडे दादांचे सिनेमे हाऊसफुल्ल चालायचे.

Continues below advertisement


दादांना मराठी सिनेसृष्टीमधील त्यांच्या योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं. पण, प्रेक्षकांना मनमुराद मनोरंजनाची पर्वणी देणारे दादा कोंडके त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी मात्र एकटेच होते. अगदी त्यांचं पार्थिव नेण्यासाठी अॅम्ब्युलन्सही मिळाली नाही. या सर्व गोष्टींचा खुलासा ज्येष्ठ पत्रकार अनिता पाध्ये यांनी केला आहे. 


नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सुप्रसिद्ध लेखिका आणि ज्येष्ठ पत्रकार अनिता पाध्ये यांनी दादा कोंडके यांच्या निधनावेळीच्या घडामोडींचा खुलासा केला. या मुलखतीदरम्यान त्यांनी दादा कोंडके यांचा मृत्यू झाला तेव्हापासून त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीपर्यंतच्या गोष्टींचा खुलासा केला.  


अनिता पाध्ये यांनी नेमकं काय सांगितलं? 


लेखिका, पत्रकार अनिता पाध्ये यांनी बोलताना सांगितलं की, "दादांचं निधन अचानक झालं. रात्री पाऊणेतीन वाजता त्यांचे मॅनेजर जीतू भाई यांचा मला फोन आला. ते मला म्हणाले की, दादांची प्रकृती बिघडली आहे. आम्ही त्यांना सश्रृषाच्या हॉस्पिटलमघ्ये घेऊन चाललो आहे. तर तुम्ही याल का? त्यांच्याबरोबर जे चार लोक काम करायचे, दादा त्यांच्याबरोबच राहायचे. मी त्यांना येते असं सांगितलं..."


दोन तास मी दादा  कोंडकेंच्या प्रेताजवळ एकटी होते : अनिता पाध्ये 


"मी माझ्या भावाला सांगितलं की, तू या लोकांबरोबर जा आणि दादांच्या नातेवाईकांना फोन कर. दादांची बहीण पुण्याला राहायची. त्यानंतर दादांना घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्सची गरज होती. हॉस्पिटलच्या दारात ॲम्ब्युलन्स उभी होती. पण,तेथील लोक म्हणाले की फॉर्म भरावा लागेल, ते रजिस्टर लॉकरमध्ये आहे, आता ड्राइव्हर नाही. त्या काळात मोठ्या प्रमाणात ॲम्ब्युलन्स नव्हत्या. एक शिवसेनेची ॲम्ब्युलन्स होती. पण, ती आम्हाला मिळाली नाही. मी पहिला फोन विजय कोंडकेंना केला. कारण, किती काही झालं तरी आम्ही बाहेरची माणसं होतो. रक्ताचे नातेवाईक ते होते. दादांच्या शेवटच्या काळात विजय कोंडकेबरोबर त्यांचे संबंध चांगले नव्हते. पण, मी त्यांना फोन केला आणि त्यांना दादांच्या निधनाबद्दल सांगितलं. दादांचे जवळचे दोन मित्र होते, त्यांना मी फोन केला. साबीर शेख त्यावेळी कामगार मंत्री होते. त्यांनाही मी फोन केला, तर ते अंबरनाथला होते. या सगळ्यात हॉस्पिटलमध्ये दोन तास मी दादांच्या प्रेताजवळ एकटी होते.", असं अनिता पाध्ये यांनी सांगितलं. 


...मी मांडीवर दादांचं प्रेत घेऊन गेले : अनिता पाध्ये


"आम्हाला ॲम्ब्युलन्स मिळाली नाही. तेव्हा दादांची कॉन्टेसा गाडी होती. कॉन्टेसा गाडीचा मागचा भाग रुंद असतो. दादांचे दोन मित्र आणि मी मांडीवर दादांचं प्रेत घेऊन गेलो. कारण, अॅम्बुलन्स नव्हत्या. त्यावेळेला इतक्या सोयीसुविधा नव्हत्या. दादा बालमोहनच्या गल्लीत एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहायचे. आम्ही दुसऱ्या मजल्यावर प्रेत घेऊन गेलो आणि संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांचे सगळे नातेवाईक, बहिणी, हिंदी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक लोक आले होते. त्यांचा मुलगासुद्धा नोकरीनिमित्त नाशिकला होता. ते सगळे आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. राजकीय लोक आले होते. छगन भुजबळ यांनी तेव्हा शिवसेना सोडली होती, पण दादांसाठी ते तिथे आले होते. बाळासाहेब ठाकरे आले होते. ते कोणाशी बोलले नाहीत... ते दादांच्या प्रेताजवळ बसले होते. त्यांच्या कपाळावरुन हात फिरवत होते... कारण, त्यांची खूप वर्षांची मैत्री होती.", असं अनिता पाध्ये यांनी सांगितलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ashok Saraf On Marathi Veteran Actress Ranjana: 'रंजना मला फॉलो करायची...'; दिग्गज अभिनेत्रीसोबतच्या ऑनस्क्रिन, ऑफस्क्रिन केमिस्ट्रीवर काय म्हणाले अशोक सराफ?