Kiku Sharda On Kapil Sharma Show: 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) टेलिव्हिजन आणि ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या शोपैकी एक. चाहते या शोच्या नव्या सीझनची आतुरतेनं वाट पाहत असतात. या शोमध्ये  कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि त्याची टीम पाहुण्यांना बोलावून त्यांची फिरकी घेते आणि त्यांच्यावर विनोद करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करते. 'द कपिल शर्मा शो' सुरू झाल्यापासूनच पोट धरुन हसायला तुम्हाला भाग पाडतो. पण, नेमका हा शो सगळा लाईव्ह असतो की, स्क्रिप्टेड असतो? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. आता या शोबाबत एक महत्त्वाचा खुलासा या शोमधून सर्वांना खळखळून हसवणाऱ्या किकू शारदा यानं केलाय. 

Continues below advertisement

'होय... स्क्रिप्टेड असतो 'द कपिल शर्मा शो'' (Kapil Sharma Show Is Scripted)

कंटेंट क्रिएटर प्रखर गुप्ता याच्यासोबतच्या एका मुलाखतीत किकू शारदानं 'द कपिल शर्मा शो'चं सीक्रेट सर्वांना सांगून टाकलंय. 'द कपिल शर्मा शो'चा बराचसा भाग हा 'स्क्रिप्टेड' असतो, असं किकू शारदानं स्पष्ट केलंय. किकू शारदानं सांगितलं की, शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना विनोद किंवा 'पंचलाईन्स'बद्दल आधीच कल्पना दिली जात नाही. जर त्यांना आधीच माहिती असेल, तर त्यांच्या नैसर्गिक प्रतिक्रिया मिळाल्या नसत्या; कारण टीमला पाहुण्यांकडून अगदी सहज आणि खऱ्या प्रतिक्रिया हव्या असतात. पाहुण्यांना पंचलाईन्स, विनोद किंवा पात्रांबद्दल आगाऊ माहिती असावी, असं त्यांना वाटत नाही. त्यानं सांगितलं की, पाहुण्यांनी मंचावरच त्या पात्रांचा अनुभव पहिल्यांदा घ्यावा, अशी त्यांची इच्छा असते, कारण तेव्हाच त्यांच्या खऱ्या प्रतिक्रिया बाहेर येतात. जरी शोसाठी एक स्क्रिप्ट असली, तरी शूटिंगदरम्यान संभाषणातून त्यात बदल केले जातात आणि स्क्रिप्ट रायटर्स त्यात हस्तक्षेप करत नाहीत.

Continues below advertisement

"कधीकधी त्या स्क्रिप्टला चिकटून राहणं कठीण..." (Kiku Sharda Revel Kapil Sharma Show)

किकू शारदानं स्पष्ट केलं की, ढोबळमानानं सांगायचं तर त्यांच्याकडे एक स्क्रिप्ट असतेच, जिचं ते पालन करतात. पण ती केवळ एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच. कधीकधी त्या स्क्रिप्टला चिकटून राहणं कठीण जाते, कारण एखादी सेलिब्रिटी पाहुणी व्यक्ती चर्चेला पूर्णपणे वेगळ्या वळणावर नेऊ शकते. अनेकदा, ऐन वेळी एखादी नवी कल्पना सुचते आणि त्यामुळे इम्प्रोव्हायझेशन करावं लागतं.

कॉमेडियन किकू शारदानं स्पष्ट केलं की, याचं प्रमाण साधारणपणे 70-30 असं असतं. शोचा सुमारे 70 टक्के भाग स्क्रिप्टनुसार चालतो, तर 30 टक्के भाग पूर्णपणे उत्स्फूर्त किंवा परिस्थितीनुसार घडणारा असतो. त्यानं पुढे सांगितलं की, कपिल शर्मा अशा प्रसंगी परिस्थिती हाताळण्यात अत्यंत कुशल आहे. जर एखादा विनोद अपेक्षित परिणाम साधू शकला नाही किंवा शोची दिशा बदलली, तर कपिल ती परिस्थिती सावरून घेतो आणि गोष्टी पुन्हा मूळ मार्गावर आणतो. दरम्यान, किकू शारदा अलिकडेच 'वेलकम टू द जंगल'मध्ये दिसलेला आणि समीर रैना यांच्या शोमध्येही पाहुणा म्हणून सहभागी झाला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kamali Zee Marathi Serial: 'थोडा ब्रेक आहे, पण मी पुन्हा येतेय...'; 'कमळी' मालिकेत 'त्या' अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री; मोठा ट्वीस्ट, पुढे काय घडणार?