Gashmir Mahajani : अभिनेता गष्मीर महाजनी (Gashmir Mahajani) हा त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे कायमच चर्चेत असतो. कोणत्याही प्रश्नाला गष्मीरने दिलेल्या उत्तरामुळे तो अनेकदा ट्रोलर्सच्याही निशाण्यावर येतो. गष्मीर त्याच्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवर आस्क गॅश असं एक प्रश्न उत्तरांचं सेशन घेतो. या सेशनमध्ये चाहत्यांच्या प्रश्नांनी उत्तरं देण्याचा प्रयत्न गष्मीरकडून केला जातो. यावेळी मराठी इंडस्ट्रीविषयी (Marathi Cinema) विचारण्यात आलेल्या प्रश्नावर गष्मीरने भाष्य केलं आहे. 


या आस्क गॅश या सेशनमध्ये गष्मीरने अनेक प्रश्नांनी उत्तर दिली. त्याची या उत्तरांनी अनेकदा सोशल मीडियावर बरीच चर्चा देखील रंगली. म्हणूनच गष्मीरच्या या प्रत्येक सेशनमध्ये कोणत्या नव्या मुद्द्यावर गष्मीर त्याचं रोखठोक मत व्यक्त करणार याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिलेली असते. नुकतच गष्मीरने दिलेल्या या उत्तराचीही सोशल मीडियावरही बरीच चर्चा रंगली आहे. 






गष्मीरने नेमकं काय म्हटलं?


आस्क गॅश या सेशनमध्ये एका चाहत्याने गष्मीरला विचारलं की, मराठी इंडस्ट्री ग्रो होऊ शकते का? याचं उत्तर देताना गष्मीरनं म्हटलं की, नक्कीच, पण आपल्याकडे आपणच आपलं कौतुक करतो आणि आपणच आपले पाय ओढतो. हा पॅटर्न तोडला पाहिजे, असं उत्तर या प्रश्नावर गष्मीरने दिलं. त्याच्या या उत्तरावर पुन्हा एकदा चाहत्यांनी पसंती दर्शवली असल्याचं पाहायला मिळत आहे.




ऐतिहासिक चित्रपटातून गष्मीर येणार प्रेक्षकांच्या भेटीला


ज्येष्ठ अभिनेते आणि गष्मीरचे वडील रवींद्र महाजनी यांचे निधन झाल्यनंतर गष्मीरने त्याच्या कामातून काही काळ ब्रेक घेतला होता. त्यामुळे काही दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून लांब आहे. पण नुकतच त्याने एका ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्याच्या या नव्या सिनेमाबद्दल चाहते देखील फार उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय. 






ही बातमी वाचा : 


Milind Gawali Post : 'मला माहितीये मी त्याला खूप खूप मिस करणार' ; अनिरुद्धची आशुतोषसाठी खास पोस्ट