Kareena Kapoor Khan On NEET Paper Leak Row: देशभरात केंद्रीय शिक्षण (Union Education Minister Dharmendra Pradhan) मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सारे विद्यार्थी एकटवले असून जोरदार आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरण (NEET Paper Leak Case) आणि एकंदरीतच शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था यामुळे विद्यार्थ्यांचा रोष वाढला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अनेक सेलिब्रिटींना पाठींबा दिला आहे. तर, कित्येक सेलिब्रिटी विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनासाठी थेट मैदानात उतरलेले. पण, काही सेलिब्रिटींनी मात्र, या आंदोलनाबाबत चकार शब्दही काढला नव्हता. त्यावरुन सोशल मीडियावर त्यांना जोरदार ट्रोल केलं जात होतं. अनेक सेलिब्रिटींनी या आंदोलनावर मौन बाळगलं होतं. यामध्ये बॉलिवूडच्या दिग्गज सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) कुटुंबीयांपैकी एक असलेल्या कपूर कुटुंबीयांचाही (Kapoor Family) समावेश आहे. त्यानंतर कपूर कुटुंबीयांची सून आलिया भट (Alia Bhat) हिनं विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट करुन आपला पाठींबा दर्शवला आणि त्यापाठोपाठ आता करिना कपूरनंही (Kareena Kapoor Khan) इन्स्टा पोस्ट करत विद्यार्थी आंदोलनावर आपलं मत मांडलं आहे.
आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) करीना कपूर खान हिनं सोशल मीडियावरून एक पोस्ट करत लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल आणि त्यांच्या मेहनतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आता मी या विषयावर अधिक काळ शांत राहू शकत नाही...", असं म्हणत करीना कपूरनं आपलं मत मांडलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर नेमकं काय म्हणाली? (Kareena Kapoor Khan On Student Protest)
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर म्हणाली की, "मी या विषयावर गेल्या काही दिवसांपासून विचार करत होते, पण आता अधिक शांत राहणं शक्य नाही. आपलं मत मांडण्यासाठी धडपडणाऱ्या इतक्या मोठ्या संख्येतील तरुणांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणं अशक्य आहे... आणि तसं केलंही जाऊ नये. आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की, एका मुलाच्या आयुष्यात शिक्षणाचं स्थान काय असतं. शिक्षण त्यांना आत्मविश्वास देतं, एक नवी आशा देतं. उद्याचा दिवस आजपेक्षा नक्कीच चांगला असेल, असा विश्वास ते कुटुंबाला देतं..."
पुढे बोलताना करिना कपूर आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाली की, "पण शिक्षण तेव्हाच प्रभावी ठरतं, जेव्हा मुलांचा त्यावर विश्वास असतो. प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि कर्तृत्व यांना काहीही किंमत उरलेली नाही, असा संशय जेव्हा त्यांच्या मनात निर्माण होतो, तेव्हा त्यांचा व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडून जातो. आपली मेहनत पुरेशी ठरेल की नाही, असा विचार कोणत्याही विद्यार्थ्याला करावा लागू नये. विद्यार्थ्यांना अशी पारदर्शक यंत्रणा हवी ज्याच्यावर ते डोळे झाकून विश्वास ठेवू शकतील आणि तिथे कर्तृत्वाला खरी किंमत असेल, कष्टाचं चीज होईल आणि प्रत्येक मुलाला समान संधी मिळेल. ही कोणतीही मोठी मागणी नाही, ही पायाभूत गरज आहे,"
"जेव्हा संपूर्ण पिढी एकत्र येऊन स्वतःच्या भविष्याबद्दल बोलते, तेव्हा त्यांचं म्हणणं ऐकून घेतो म्हणजे, त्यांच्यावर उपकार करत नाही; तर ती आपली नैतिक जबाबदारी आहे. आपली मुलं आपल्याकडे अत्यंत बारकाईनं पाहत असतात. आपण आता काय भूमिका घेतो, यावरूनच त्यांना कळेल की, निष्पक्षता आणि विश्वास या गोष्टी खरोखर अस्तित्वात आहेत. ती मुलं उद्याच्या दिवसाची तयारी करत नसून, तीच आपला उद्याचा भविष्यकाळ आहेत...", असं करीना कपूर-खान म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
