उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे आगामी सुलतान सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला सलमान खान पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मुंबईतल्या वांद्रे इथं 2002 साली फुटपाथवर सलमानची गाडी चढली होती. या घटनेत फुटपाथवर झोपलेल्या एकाचा मृत्यू , तर इतर 3 जण जखमी झाले होते. सलमान खान दारु प्यायलेला असून तो स्वतःच गाडी चालवत होता, असा दावा सरकारी पक्षाचा आहे.