नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला पुन्हा एकदा तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. 2013 साली दिल्ली उच्च न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी राजपालला पुन्हा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.


चार वर्षांपूर्वी दिल्लीतील उद्योजक एम.जी आग्रवाल यांनी राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीविरोधात पाच कोटींचे कर्ज बुडवल्याचा आरोप करुन न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने या संदर्भात राजपाल यादवला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. परंतु 2013 साली राजपालने खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने उच्च न्यायालयाने त्याला दहा दिवसांची शिक्षा ठोठावली. यानंतर त्यांनी चार दिवसांचा तुरुंगवासही भोगला. त्याच्या वकिलांनी न्यायालयाकडे विनंती करुन त्याची सहा दिवसांची शिक्षा माफ केली. पण न्यायालयाने राजपालला दिल्ली बाहेर न जाण्यास सांगितले होते.