"कलेला सीमा नसतात वगैरे बोलणं ठीक आहे. मीही एक कलाकार आहे. कलाकार काही आकाशातून पडत नाहीत. मात्र, उरी हल्ल्याचा पाकिस्तानी कलाकारांना निषेध करण्यास सांगूनही, त्यांनी निषेध केला नाही.", असे म्हणत राज यांनी पाकिस्तानी कलाकारांवर निशाणा साधला.
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात थारा नको, अशी भूमिका घेत मनसेने पाक कलाकारांना विरोध केला. यानंतर अनेक पाकिस्तानी कलाकार आपापल्या घरी परतले. मात्र, त्यानंतर सलमान खानने पाक कलाकारांची पाठराखण करत कलाकार आणि दहशतवादी यांच्यात फरक असतो, असं म्हटलं होतं.