Javed Akhtar: सुप्रसिद्ध लेखक, गीतकार आणि कवी जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी भारतातच नाही तर जगभरात विशेष ओळख निर्माण केली आहे. जावेद अख्तर हे विविध विषयांवर आपली मतं मांडत असतात. त्यांच्या लेखन शैलीला अनेकांची पसंती मिळते. जावेद अख्तर यांनी लिहिलेले डायलॉग्स, गाणी ही प्रेक्षकांची मनं जिंकतात. लेखनक्षेत्रातील योगदानाबद्दल जावेद अख्तर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. आता लवकरच त्यांना लंडन SOAS विद्यापीठाकडून (SOAS University of London) डॉक्टरेट पदवी देण्यात येणार आहे. 


लंडनच्या SOAS विद्यापीठानेच्या निवेदनानुसार, जावेद अख्तर यांना मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. कवी, गीतकार, पटकथा लेखक  या क्षेत्रांमधील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (DLit) म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.


लंडनच्या SOAS विद्यापीठाच्या एका समारंभामध्ये जावेद अख्तर यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (Doctor of Literature) म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. हा समारंभ सप्टेंबरमध्ये 5, 6 किंवा 7  तारखेला होऊ शकतो.  SOAS विद्यापीठाच्या निवेदनानुसार  विविध क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना मानद डॉक्टरेट दिली जाते. 


अंदाज, जंजीर, डॉन (1978), दिल चाहता है, दीवार,शोले, सागर (1985),सिलसिला, सीता और गीता या चित्रपटाच्या पटकथा जावेद अख्तर यांनी लिहिल्या आहेत. जावेद अख्तर यांना पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार या पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं आहे. 


जावेद अख्तर हे त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमधील एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले होते. पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये जावेद अख्तर म्हणाले, 'आम्ही मुंबईकर आहोत. आमच्या शहरावर हल्ला कसा झाला? ते आम्ही पाहिले. ते लोक ना नॉर्वेतून आले होते ना इजिप्तमधून आले होते.  हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत, अशी एखाद्या भारतीयाची तक्रार असेल तर वाईट वाटू देऊ नका.'


पुढे ते म्हणाले, 'आम्ही नुसरत फतेह अली खान, मेहंदी हसन यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. तुमच्या देशात तर लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन झाले नाही.' जावेद अख्तर यांच्या या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर झाली होती. अनेकांनी जावेद यांच्या या वक्तव्याचं कौतुक केलं होतं. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Javed Akhtar was in Pakistan:  मुंबई हल्ल्याबाबत वक्तव्य केल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी कशी प्रतिक्रिया दिली? जावेद अख्तर यांनी म्हटले...