जाने तू या जाने ना, आय हेट लव्ह स्टोरीज या सिनेमांमधून झळकलेला नायक इम्रान खानने अभिनय सोडल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. इम्रानच्या मित्राने ही बातमी माध्यमांना सांगितली. त्यानंतर मात्र इम्रान आणि त्याची दीर्घ काळची मैत्रीण आणि पत्नी अवंतिका मलिक यांच्यात काहीतरी कुरबूर असल्याचं समोर आलं आहे. अवंतिकाच्या वडिलांनीही काही दिवसांपूर्वी यावर सूचक विधान केलं होतं.


इम्रान खान बॉलिवूडमध्ये आला तोच आमीर खानचा पुतण्या म्हणून. त्याचं मोठं स्वागत झालं होतं. कालांतराने 2014 मध्ये इम्रानने आपल्या मैत्रिणीशी लग्न केलं. ते लग्नही मोठ्या थाटात झालं होतं. या दोघांना एक मुलगीही झाली. तिचं नाव इमरा. पण आता मात्र दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय की काय अशी शक्यता वाटू लागली आहे. याला कारणीभूत ठरली आहे अवंतिकाची भावनिक पोस्ट. अवंतिका आपल्या पोस्टमध्ये लिहिते, तुम्हाला कोणतीही अडचण आली असेल तर त्या अडचणीला समारं जा. तिच्यासोबत बसा. तिच्यापासून पळून जाणं, तिला गिळून टाकणं.. तिच्याकडे दुर्लक्ष करून झोपून जाणं अशा गोष्टी करण्यापेक्षा त्या अडचणीला समोरं जाऊन तिला तोंड देणं कधीही चांगलं. असं म्हणून अवंतिकाने आपण या अडचणीसोबत बसल्याचं सांगितलं आहे.


धूम 2 ला चौदा वर्षं पूर्ण, ह्रतिक-ऐश्वर्याचा हॉट अवतार आजही प्रेक्षकांच्या आठवणीत


अवंतिका आणि इम्रान यांच्यात काही महिन्यांपासून वाद सुरू असल्याचं 2019 मध्ये समोर आलं होतं. या बातमीला दोघांनीही दुजोरा दिला नव्हता. पण अवंतिकाच्या वडिलांनी मात्र काही दिवसांपूर्वी अत्यंत सूचक वक्तव्या केलं. इम्रान आणि अवंतिकामधलं नातं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तो प्रश्न हे दोघे सामंजस्याने सोडवतील. इम्रानने अभिनय सोडल्यानंतरच्या बातम्यांबद्दलही त्यांना विचारण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते, की इम्रानने अभिनय सोडणं हा त्याचा निर्णय आहे. पण इम्रानच्या पत्नीला तसं वाटत असेलच असं नाही. या त्यांच्या वक्तव्यावरून या दोघांमध्ये काहीतरी कुरबुरी सुरू असल्याचं कळत होतं.