सीआयडी मालिकेला 20 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्ताने अभिनेते शिवाजी साटम 'माझा कट्टा'वर आले. यावेळी त्यांनी ‘दया… कुछ तो गडबड है’ या संवादाचा कसा जन्म झाला याबाबतचा किस्सा सांगितला.
दरम्यान, सीआयडीसारख्या मालिकांमुळे समाजातील गुन्हेगारी वाढल्याच्या चर्चांचेही त्यांनी यावेळी खंडन केलं. “गुन्हे घडतात, त्यामुळे तपास होतो. त्यामुळे सीआयडी सारख्या मालिकांमुळे गुन्हेगारी वाढली, असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे. जर समाजात गुन्हेच घडले नसते, तर तपास यंत्रणाही उभाराव्या लागल्या नसत्या,” असं परखड मत ही त्यांनी यावेळी मांडलं.
सीआयडीच्या यशाबद्दल शिवाजी साटम म्हणाले की, “सीआयडी मालिकेने जनमानसात स्वत:ची वेगळी ओळख नक्कीच निर्माण झाली. पण यामुळे मालिकेचं टाईट शेड्यूल आणि इतर कारणांमुळे नाटकांत काम करणं बंद करावं लागलं. पण तरीही मालिकेच्या यशामुळे आपण समाधानी असल्याचं मत व्यक्त केलं.