सरकारकडून घरावर पाळत, एजाज खानचे भाजपवर आरोप
एबीपी माझा वेब टीम | 27 Apr 2017 08:58 AM (IST)
मुंबई : भाजप सरकार आपल्या घरावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप अभिनेता एजाज खानने केला आहे. आपल्या घरात ड्रग्ज आढळत असल्याचं सांगून भाजपने आपल्या घरावर पाळत ठेवल्याचं एजाजने म्हटलं आहे. मी सध्या शूटिंगसाठी बाहेर आहे. घरात पत्नी आणि मुलगा दोघेच आहे आणि दहा ते बारा पोलिस घरी आले आहेत. घरात ड्रग्ज असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र कोणत्याही सर्च वॉरंटशिवाय घराची तपासणी केली जात असल्याचा आरोप एजाजने केला. सुरक्षेच्या दृष्टीने चाहत्यांनी आपल्याला सहकार्य करण्याची मागणी एजाज खाननं केली आहे. शिवाय भाजप सरकारने आपल्याला निशाणा केल्याचा आरोप एजाजने केला आहे. पाहा व्हिडिओ :