Aishwarya Rai Bachchan And Abhishek Bachchan: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) या दोघांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक हे दोघे लवकरच विभक्त होणार आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्या राय बच्चनने अभिषेक आणि त्याच्या कुटुंबाबाबत मोठा खुलासा केला होता.


ऐश्वर्या म्हणाली, "रोज भांडण होतं"


2010 मध्ये 'वोग इंडिया'ला दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी त्यांच्यात रोज  भांडण होत असल्याची कबुली दिली होती. ऐश्वर्याने मुलाखतीमध्ये त्यांच्यात भांडण होते, असे म्हटले होते पण अभिषेकने मात्र भांडणाचे वर्णन 'मतभेद' असे केले होते. 


ऐश्वर्याने एका पोर्टलला सांगितले की, 'रोज भांडण होत असते.' त्यानंतर अभिषेकनं हे भांडण नसून एखाद्या गोष्टीवरून मतभेद असल्याचे स्पष्ट केले. "ते भांडण गंभीर नाही , पण हेल्थी चर्चा आहे. कारण असे झाले नाही तर जीवन पूर्णपणे कंटाळवाणे होईल.", असंही अभिषेकनं सांगितलं.




एकमेकांमधील मतभेद कसे सोडवतात? याबद्दल अभिषेक बच्चनने सांगितले होते, सहसा तोच भांडणानंतर माफी मागतो.  त्याला प्रश्न विचारण्यात आला की,"घरात भांडण कोण सोडवतं?" तर अभिषेक म्हणाला, 'मी! पण आमचा नियम आहे, आम्ही भांडण करुन कधीच झोपत नाही."


अभिषेकनं पुढे सांगितलं, " मी माफी मागण्याचे कारण हे अनेक वेळा असे सांगतो की, मला खूप झोप लागली आहे आणि झोपायला जायचे आहे! महिला नेहमीच महान असतात आणि त्या नेहमीच बरोबर असतात. पुरुष हे जितक्या लवकर स्वीकारतील तितके चांगले. तुम्ही काय म्हणता याने त्यांना काहीही फरक पडत नाही, तुमच्याकडे ठोस पुरावे असले तरी त्याचा देखील अर्थ नाही. तो निरुपयोगी आहे."


अभिषेक आणि ऐश्वर्याचे चित्रपट


 ऐश्वर्या ही मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेल्या पोन्नियिन सेलवन या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर अभिषेकचा घुमर हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. ज्यामध्ये सैयामी खेरनं देखील काम केलं होतं. आता ऐश्वर्या आणि अभिषेकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या अन् अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाची भलतीच चर्चा, पण Video समोर येताच सर्वच स्तब्ध झाले!