Aamir Khan Wedding :   बॉलीवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अभिनेता आमिर खान (Aamir Khan)  हा आपल्या चित्रपटांमुळेच नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आमिर खान आणि किरण राव यांनी 2021 मध्ये परस्पर संमतीने संसारात काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आमिर खान याच्या तिसऱ्या विवाहाची चर्चा रंगली होती. त्याचे नाव बॉलिवूड अभिनेत्रीसोबतही जोडण्यात आले होते. त्यामुळे आमिर खान तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार का, याची चर्चा सुरू झाली होती. आपल्या विवाहाच्या चर्चेवर मौन सोडले आहे. 


आमिर खानने दोन लग्न केले होते. पहिला विवाह हा 18 एप्रिल 1986 रोजी रीना दत्तासोबत झाला होता.  आमिरला जुनैद नावाचा मुलगा आणि इरा नावाची मुलगी आहे. 2002 मध्ये आमिरचे नाते संपुष्टात आले आणि रीनाने दोन्ही मुलांचा ताबा घेतला. यानंतर आमिर खानने त्याची दुसरी पत्नी किरण रावशी लग्न केले आणि तिच्यापासून आमिरला आझाद नावाचा मुलगा आहे ज्याचा जन्म सरोगसीद्वारे झाला.


आमिर खान पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार?


2021 मध्ये आमिर खान आणि किरण राव यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याची घोषणा केली होती. आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये आमिर खानने आपल्या लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.  रिया चक्रवर्ती ही  सध्या यूट्यूबवर पॉडकास्ट करत आहे. या पॉडकास्टमध्ये नुकतीच अभिनेता आमिर खानने हजेरी लावली होती. यावेळी आमिरला तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. आमिर खानने सांगितले की, लग्न हा एक कॅनव्हास आहे. जे दोन लोक एकत्र रंगवतात. तू पुन्हा लग्न करशील का? असे विचारले असता आमिर म्हणाला- मी आता 59 वर्षांचा आहे.


पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार?


आमिर खानने सांगितले की, मला वाटत नाही की मी पुन्हा लग्न करू शकेन. मला ते थोडं अवघड वाटत आहे. सध्या माझ्या आयुष्यात खूप नाती आहेत. मी पुन्हा एकदा माझ्या कुटुंबात सामील झालो आहे. मला मुले आहेत, भाऊ आणि बहिणी आहेत." आमिर खान म्हणाला की, माझ्या जवळ असणाऱ्या लोकांसोबत मी आनंदी आहे. मी एक चांगला व्यक्ती होण्यासाठी प्रयत्न करत आहे. 


अभिनेता आमिर खान हा सध्या 2007 मध्ये आलेल्या 'तारे जमीन पर' या आयकॉनिक चित्रपटाचा सिक्वेल बनवण्यात व्यस्त आहे. या चित्रपटाचे नाव 'सीतारे जमीन पर' असे असणार आहे. या चित्रपटात जेनेलिया डिसूझा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.