विशेष म्हणजे ‘शोले’ प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातील या सिनेमाकडे फार कुणी लक्ष दिले नव्हते. समीक्षकांनीही ‘शोले’ची म्हणावी तितकी दखल घेतली नव्हती.
याच काळात ‘जय संतोषी माँ’ हा सिनेमा अधिक वरचढ ठरताना दिसत होता. मात्र, नंतर ‘शोले’ सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि पुढे तर या सिनेमाने ऐतिहासिक लोकप्रियता कमावली.
विशेष म्हणजे सुरुवातीच्या काही समीक्षणपर लेखांमध्ये समीक्षकांनी महानायक अमिताभ बच्चन यांचा साधा उल्लेखही केला नव्हता.
‘बॉलिवूड लाईफ’च्या एका वृत्तानुसार, एका इंग्रजी वर्तमानपत्राने शोल सिनेमाच्या समीक्षणामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांचा उल्लेखही केला नव्हता. अमिताभ यांचा उल्लेख ‘धरम का दोस्त’ असा केला होता. त्याचवेळी अमजद खान यांच्या नावाचा उल्लेख मात्र होता.
दरम्यान, अजूनही शोले सिनेमाचं गारुड भारतीय प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.