TanyaMittal: बिग बॉस 19 हा सिझन प्रचंड चर्चेत राहिला होता. बिग बॉस19मधील फायनलिस्टतान्यामित्तलशोमधील तिच्या विधानांमुळे आणि दाव्यांमुळेचर्चेतआलीहोती. सलमानखाननेस्वत: तिला अंतिम फेरीत सांगितले की, ती शोच्या इतिहासातील सर्वात चर्चेत असलेली स्पर्धक आहे. तान्या तिच्या संपत्ती आणि लाइफस्टाइलमुळे चर्चेत आली होती. तिनं केलेल्या दाव्यांवर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. तिनं बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर एक व्हिडिओहीशेअर केला होता. या व्हिडिओत तिच्या मालकीची कंडोमफॅक्टरी दिसत होती. तान्याने एका शोमधून एक वेगळाच खुलासा केला आहे. तिनं केलेल्या खुलाशामुळे तान्या पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.
तान्यानेस्वत: एका शोमध्येम्हटलं की, तिनं कधीही इतकी मोठी सुरक्षाटीम असल्याचा दावा केला नव्हता, असं ती म्हणाल. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तान्या तिच्या गावी परतली होती. अलिकडेच एका युट्यूबचॅनेलवरीलव्हिडिओमुलाखतीदरम्यान, तान्याने तिच्या कारखान्याची एक झलक शेअर केली. या शोच्याचर्चेदरम्यानतिनं150 बॉडीगार्ड असण्याचा दावा खोटा असल्याचं सांगितलं. "मी असं कधीच म्हटलं नाही की, माझ्याकडे 150बॉडीगार्ड आहेत. मी असं कोणत्याही मुलाखतीत किंवा शोमध्येम्हटलेलं नाही. हे सर्व बनावट आहे. इंटरनेटवर तुम्हाला माझा 150बॉडीगार्ड्स असल्याचे सांगणारा एकही व्हिडिओ सापडणार नाही. झीशान (कादरी) विनोद करत होता. मी त्याला सांगितले होते की, माझ्याकडे 150हून अधिक कर्मचारी आहेत. पण त्याने बॉडीगार्ड्स असल्याचा गैरसमज करून घेतला", असं स्पष्टीकरण तान्यामित्तलहिनं दिलं.
तान्याकडेपर्सनलसिक्युरिटीगार्ड्स
तान्यामित्तलकडे सध्या पर्सनलसिक्युरिटीगार्ड्स आहेत. परंतु, आतापर्यंत तिने कोणताही आकडा उघड केला नाही. तिच्या व्यवसायांबद्दल बोलताना तान्या म्हणाली, "माझ्याकडे सध्या टेक्सटाईलफॅक्टरी, एका फार्मा कंपनी आणि एक गिफ्टफॅक्टरी आहे. मी याआधी कधीच खोटे बोलले नाही. पण मी तुम्हाला सगळं काही सांगूही शकत नाही", असं तान्या म्हणाली. "माझ्याकरिअरमध्ये एक नवीन टप्पा आला आहे. मी अभिनेत्री झाले आहे. निर्माता एकता कपूर यांनी एक टेलिव्हिजन मालिकेची ऑफरदिलीये. सध्या मी माझ्याडाएटकडे लक्ष ठेवून आहे", असं तान्याने स्पष्ट केलं. दरम्यान, तान्या लवकरच एका मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका नेमकी कोणत्या विषयावर आधारित असेल? या मालिकेत तान्यामित्तल मुख्य भूमिकेत असणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
