Bhay The Gaurav Tiwari Mystery Series Review: सध्या ओटीटीमुळे (OTT) मनोरंजन प्रत्येकाच्या हातात आलंय. आपण कधीही, कुठेही आणि केव्हाही आपल्याला वाटेल तेव्हा अगदी सहज सिनेमे (Movies), वेब सीरिज (Web Series) पाहू शकतो. सध्या ओटीटीची (OTT Released) चलती असल्यामुळे अॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या (Amazon Prime Video) एमएक्स प्लेअरवर (MX Player) प्रदर्शित झालेली 'भय: द गौरव तिवारी मिस्ट्री' (Bhay: The Gaurav Tiwari Mystery) ही वेब सीरिज (Web Series) सध्या प्रेक्षकांच्या मनाला भिडतेय. ही सीरिज भारतातील प्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्सपर्ट गौरव तिवारी यांच्या खऱ्या आयुष्यावर आणि त्यांच्या गूढ मृत्यूवर आधारित आहे.
एका प्रसिद्ध घटनेवर आधारित ही कथा केवळ घाबरवणारी नाही तर प्रत्येक वळणावर विचार करायला लावते. 'भय' ही वेब सीरिज रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. जर तुम्हाला हॉरर थ्रीलर असं काही पाहायचं असेल तर, तुमच्यासाठी ही उत्तम पर्याय ठरेल. नुकताच प्रदर्शित झालेली 'भय' ही सीरिज लोकांना घाबरवते आणि समीक्षकांकडूनही या सीरिजला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.
एक अशी कथा जी, तुम्हाला हादरवून टाकेल
'भय: द गौरव तिवारी मिस्ट्री' ही वेब सीरिज एका थंडगार शवगृहाच्या सीनपासून सुरू होते, जिथे गौरव तिवारीचं शवविच्छेदन सुरू आहे. सुरुवातीला पोलीस ती आत्महत्या असल्याचं गृहीत धरतात, पण त्यानंतर त्याच्या मानेवर आढळलेल्या विचित्र खुणा कथेला वेगळ्या दिशेनं घेऊन जातात. त्यानंतर एका लेखकाची एन्ट्री होते, ज्या गौरवच्या जीवनावर पुस्तक लिहायचं आहे आणि तिथेच ही कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल की, एक पायलट होण्याचं स्वप्न पाहणारा तरुण पॅरानॉर्मल दुनियेच्या खोलात कसा जातो.
रहस्यमय मृत्यू अन् न सुटलेले प्रश्न
फ्लॅशबॅकमध्ये गौरवची इच्छा पायलट बनण्याची होती, पण एक दिवस, विमान चालवत असताना, त्याच्यासोबत असं काहीतरी घडतं, ज्यामुळे तो पॅरानॉर्मल एक्सपर्ट बनण्याचा निर्णय घेतो. या काळात, तो इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीमध्ये सामील होतो, जिथे तो इतर तीन लोकांसोबत काम करतो. सुरुवातीला, गोष्टी व्यवस्थित होतात, पण पाच वर्षांनी, विचित्र घटना घडू लागतात आणि गौरवचा गूढपणे मृत्यू होतो. 'भय' ही वेब सीरिज तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. या सीरिजमध्ये असे अनेक सीन्स आहेत, जे पाहून अंगावर काटा येईलच, पण हात-पाय थरथरायला लागतील.
उत्कृष्ट अभिनय अन् दमदार दिग्दर्शन
करण टॅकर, गौरव तिवारीला जिवंत करतो आणि त्याचा गंभीर दृष्टिकोन कथेला बळकटी देतो. त्याच्यामुळे कल्की कोचलिन, सलोनी बत्रा, दानिश सूद, शुभम चौधरी आणि निमिषा नायर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. रॉबी ग्रेवाल या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, ज्यामध्ये भयपट आणि सस्पेन्सचं एक अनोखं मिश्रण आहे. 12 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेली ही मालिका ओटीटीवरील भयपट प्रेमींसाठी एका मेजवानीपेक्षा कमी नाही.
पाहा ट्रेलर :
महत्त्वाच्या इतर बातम्या :