Alia Ranbir Wedding : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचे लग्न झाले आहे. यानंतर दोघांनीही मीडियासमोर त्यांच्या लग्नाचा लूक दाखवला आहे. लग्नाचे पाहुणेही एक एक करून निघून गेले आहेत आणि आता आलिया आणि रणबीर आपली नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत.


कपूर आणि भट्ट कुटुंबासाठी गुरुवारचा दिवस कायमचा अविस्मरणीय ठरला. या दिवशी ही दोन्ही कुटुंब कायमची एकत्र आली आहेत. पाच वर्षांच्या नात्याला आलिया-रणबीरने आता लग्नाचे एक नाव दिले आणि त्यांनी त्यांच्या नवीन आयुष्याला आनंदाने सुरुवात केली. त्याचवेळी आता त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन होणार नसल्याचीही माहिती दिली आहे. या गोष्टीला नीतू कपूरने स्वतः दुजोरा दिला आहे.


नीतू कपूर म्हणाल्या...


लग्नाचे सर्व विधी आटोपल्यानंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) मुलगी रिद्धिमा आणि जावई भरत साहनीसोबत मीडियासमोर आल्या. त्यांनी पापाराझींचे आभार मानले आणि आलिया-रणबीरवर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. याशिवाय त्यांना रिसेप्शनबाबत विचारण्यात आले असता, त्यांनी रिसेप्शन होणार नसल्याचे स्पष्ट केले. उलट त्या म्हणाल्या की, सगळं झालं आता तुम्ही आरामात घरी जाऊन झोपा.


लग्नाबाबत ‘वास्तू’मध्ये लगबग सुरू असतानाच, पाच दिवसांपासून पापाराझी लग्नाच्या ठिकाणी उभे होते, तेव्हापासूनच मीडिया येथे जमा झाला होता. मीडिया प्रेक्षकांना सतत प्रत्येक अपडेट देत होती आणि प्रेक्षकांना देखील वधू वराची एक झलक मिळावी म्हणून आतुरता लागली होती. लग्नानंतर आलिया आणि रणबीर मीडियासमोर आले आणि इथे जे काही घडलं, ते पाहून प्रेक्षकही चांगलेच खुश झाले. रणबीर कपूरने सर्वांसमोर आलिया भट्टला उचलून घेतले आणि आपले प्रेमही व्यक्त केले.


हेही वाचा :