मुंबई : शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार अरविंद सावंत आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद सांवत यांचं नाव मंत्रिपदासाठी दिलं आहे. त्यामुळे आज संध्याकाळी सावंत मंत्रिपदाची शपथ घेतील, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.


दरम्यान, खासदार अरविंद सावंत भल्या पहाटे त्यांच्या शिवडी इथल्या घरातून दिल्लीसाठी रवाना झाले. अरविंद सावंत यांचं कुटुंबही शपथविधीसाठी दिल्लीत उपस्थित राहणार आहेत.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (30 मे) दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्रीदेखील शपथ घेतील. एनडीएमधील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

लोकसभेच्या एकूण 542 जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) 350 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीला घवघवीत यश मिळालं आहे. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 41 जागा युतीने जिंकल्या आहेत. त्यापैकी भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या.

नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी इतर मंत्र्यांचेही शपथविधी होतील. एनडीएतील सेकेंड लार्जेस्ट पार्टी (एनडीएतील सर्वाधिक खासदार असलेला दुसरा पक्ष) असलेल्या शिवसेनेला आता दोन कॅबिनेट मंत्रीपदं आणि एका राज्यमंत्रीपदाची आशा आहे. परंतु आज शिवसेनेचा एकच खासदार मंत्रिपदाची शपथ घेण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

व्हिडीओ पाहा



कॅबिनेट मंत्रीपद मिळवण्यासाठी शिवसेनेचे काही खासदार गेल्या काही दिवसांपासून लॉबिंग करत आहे. दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत आणि यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी हे तिघेजण त्यामध्ये आघाडीवर आहेत. परंतु अरविंद सावंतांचे नाव फायनल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

वाचा : मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे स्थान कसं असणार?

#मराठीतशपथ मोहिमेला 'माझा'चा पाठिंबा, अनेक खासदारांची मराठीत शपथ घेण्याची तयारी | ABP Majha



आठवलेंचं मंत्रीपद पक्कं?
दरम्यान, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे मंत्रिपद कायम राहणार का हादेखील सर्वांना प्रश्न आहे. आठवलेंना नाकारले तर त्याची जास्त चर्चा होऊ शकते. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर भाजप आठवलेंना डावलण्याची रिस्क घेणार नाही.