Maharashtra ZP Election latest News : ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळं (OBC Political Reservation) पुढं ढकलण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता राज्यात पार पडणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनतर राज्य निवडणूक आयोगानं (Maharashtra Election Commision) निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरु झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषद गट गण रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  राज्य निवडणूक आयोगाने जिल्हापरिषद, पंचायत समित्यांची गट आणि गण रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 


असून नगर पालिकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने जिल्हापरिषद, पंचायत समित्यांची गट आणि गण रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जून महिन्याच्या अखेरीस जिल्हापरिषद गट आणि पंचायत समिती गणांची रचना पूर्ण झालेली असेल. राज्य निवडणूक आयोगाने आता जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गट आणि गण रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  


असा असेल कार्यक्रम..


गट आणि गण रचनेचे प्रारूप आयुक्तांकडे पाठवणे : 23 मे


त्या आराखड्यांना आयुक्तांनी मंजुरी देणे : 31 मे


प्रारूप गट गण रचना प्रसिद्धी : 2 जून 2022


प्रारूप रचनेवर आक्षेप : 8 जून 2022


आक्षेपांवर सुनावणी घेऊन अंतिम स्वरूप देणे : 22 जून 2022


अंतिम गट गण रचनेची प्रसिद्धी : 27 जून 2022 


राज्यातील 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका


राज्यातील 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. यात रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (sindhudurga), नाशिक (Nashik), जळगाव (Jalgaon), अहमदनगर (Ahemadnagar), पुणे (pune), सातारा (satara), सांगली (sangli), सोलापूर (solapur), कोल्हापूर (Kolhapur), औरंगाबाद (Aurangabad), जालना (Jalna), परभणी (parbhani), हिंगोली (hingoli), बीड (Beed), नांदेड (Nanded), उस्मानाबाद (osmanabad), लातूर (latur), अमरावती (Amravati), बुलढाणा (Buldhana), यवतमाळ (Yavatmal), चंद्रपूर (Chandrapur), वर्धा (Wardha), गडचिरोली (Gadchiroli) या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा धुरळा येत्या काही काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आधीच पार पडलेल्या आहेत. 


सर्व निवडणुका दोन टप्प्यात घेण्याची तयारी 


असा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. म्हणजे 27 जून नंतर जिल्हापरिषद पंचायत समित्यांचे मतदारसंघ अंतिम झालेले असतील. त्यानंतर निवडणुकीचा रंग चढणे सुरु होईल. राज्यात एकूण 14 महापालिका 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणं बाकी आहेत. दोन वर्षानंतर एकत्र आलेल्या निवडणुका एकाच वेळी घेणं सोपं नाही. त्यामुळे या सर्व निवडणुका दोन टप्प्यात घेण्याची तयारी निवडणूक आयोग करत असल्याची माहिती आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Election : राज्यातील 14 महानगरपालिकांच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता, राज्य निवडणूक आयोगाकडून हालचाली


राज्यात लवकरच पालिका निवडणुकांचं बिगुल, महापालिकेची अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार