= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिकच्या पंचवटी खून प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई #नाशिक खून अपडेट...
नाशिक शहर पोलिसांची मोठी कारवाई,नाशिकच्या पंचवटी येथील खून प्रकरणातील इतर तीन आरोपी पोलिसांनी घेतले ताब्यात...
नाशिकच्या पंचवटी परिसरात दोन दिवसांपूर्वी किरकोळ वादातून निशांत भोये या युवकाची डोळ्यात मिरचीची पूड टाकून घरदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली होती या संदर्भात नाशिक गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाना मोठी कामगिरी केली आहे या पुण्यातील पाच आरोपींना जेरबंद करण्यात नाशिक शहर पोलिसांना यश आले आहे. नाशिक शहर पोलिसांचे पथक दोन दिवसांपासून मारेकऱ्यांच्या मागावर होते अखेर नाशिकच्या येवला तालुक्यात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिककरांनो पाणी जपून वापरा, शहरात शनिवारी पाणीबाणी! नाशिक ब्रेकिंग...
- नाशिक शहरात शनिवारी पाणीपबाणी, दिवसभर पाणीपुरवठा शहरात राहणार बंद...
- स्मार्ट सिटी कंपनी आणि मनपा पाणीपुरवठा वितरण विभागाच्या माध्यमातून जलशुद्धी केंद्रावर करण्यात येणार दुरुस्तीची कामे
- नाशिक शहरात बूस्टर पंपिंग, प्लास्टिक वॉल कंपाऊंड, पाणी गळती असे विविध कामे करण्यात येणार
- शटडाऊन कालावधी शनिवारी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत राहणार...
- नागरिकांनी मनपा प्रशासनाला सहकार्य करावे अधिकार प्रशासनाचे नाशिककरांना आवाहन...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाज्यांचे दर कडाडले! आवक घटल्यानं किलोमागे गाठली शंभरी, पहा भाव अहिल्यानगर
राज्यात थंडीचा कडाका वाढत असतानाच भाज्यांचे दरही वाढत आहेत... 40 ते 60 रुपये किलो दराने मिळणारी भाजी 100 ते 120 रुपये किलो पर्यंत पोहोचली आहे...
शेवगा तब्बल 400 रुपये किलो पर्यंत पोहोचला आहे... तर गवारीची शेंग देखील 160 ते 200 रुपये किलो पर्यंत पोहोचली आहे... भाज्यांची आवक कमी होत असल्याने ही दरवाढ झाली आहे... अहिल्यानगरच्या दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थंडीमुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे... शेवगा, लसुन आणि गवार याच्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे.... घाऊक बाजारात लसुन 400 रुपये, शेवगा 300 रुपये, गवार 100 ते 125, वाटाणा 80 ते 90 रुपये असून इतर भाजीपाल्याचे भाव चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत स्थिर आहेत... नागपूर, पुणे, नाशिक लासलगाव, करमाळा तसेच नगर तालुक्यातील काही भागातून भाजीपाल्याची आवक होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे...आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्याला सध्या चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
दहावीच्या परीक्षेला होमसेंटर यावं यासाठी शाळेला टाळे ठोकत गावबंद आंदोलन! धाराशिव :
तडवळेकरांचा परीक्षा केंद्रासाठी रस्त्यावर ठिय्या
गावात दहावीपर्यंतची शाळा आहे मात्र मुलांना परीक्षेसाठी परगावी जावं लागतं. या विरोधात धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळा येथील ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकत गावबंद आंदोलन केलं. तसेच काही काळ ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदवला. धाराशिव जिल्ह्यातील तडवळे गावात दहावीपर्यंतची शाळा आहे. मात्र परीक्षा केंद्र नाही. परीक्षेसाठी येथील मुलांना ढोकी येथील परीक्षा केंद्रावर जावं लागतं. परीक्षेला जात असताना अनेक अपघाताच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे दहावीचे परीक्षा केंद्र गावातच असावं अशी गावकऱ्यांची मागणी आहे. मागणीची दखल घेतली जात नसल्याने संतप्त होत गावकऱ्यांनी आज शाळेला टाळे ठोकत गावबंद आंदोलन केलं. परीक्षा केंद्रासाठी लागणारी पटसंख्या शाळेची आहे. आजूबाजूच्या गावातूनही विद्यार्थी तडवळा येथे शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी दहावीची बोर्ड परीक्षा गावातच व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिक्षण विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे त्याबाबतची मागणी करण्यात आली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय आज दिल्लीत ब्रेक
काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय आज दिल्लीत होणार
त्यासाठी इकडे शिंदे चार वाजता दिल्लीला रवाना होणार
कालच पत्रकार परिषद घेऊन अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचे एकदा शिंदे यांनी केले होते जाहीर
त्यानुसार आज महायुतीच्या तिन्ही नेत्यांची अमित शहा यांच्याबरोबर संध्याकाळी दिल्लीत होणार बैठक
महायुतीच्या सत्ता स्थापने संदर्भात अतिशय महत्त्वाचे निर्णय आज घेतले जाणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रेल्वेरुळाला तडा पाहून 4 किमी धावला, ट्रॅकमॅनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला Amravati Breaking
रुळाला तडा गेल्याने ट्रॅकमॅनच्या सातर्कतेमुळे मोठा अपघात टळला
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे जवळ अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस रेल्वे ट्रॅकमॅनने वेळेतच थांबवली रेल्वे अन्यथा...
रेल्वे रुळाला तडा पाहून ट्रॅकमॅम चार किलोमीटर पळून जाऊन थांबवली सुपरफास्ट रेल्वे...
आज सकाळची घटना..
ट्रॅकमॅनचा होतेय सर्वत्र कौतुक...
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईच्या टिळक भवन येथे काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची बैठक काँग्रेसने आज मुंबईच्या टिळक भवन येथे आपल्या पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली आहे.
मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी यांच्या सुचनेनंतर कांग्रेस मध्ये पराभवाचे मंथन केले जाणार आहे…
१०२ जागा लढणाऱ्या काँग्रेसला फक्त १६ जागेवर जिंकता आले.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा हा आजवरचा सर्वात मोठा दारुण पराभव आहे…
त्यावर आज काँग्रेसच्या बैठकीत मंथन होणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अनधिकृत इमारती पाडण्यासाठी पालिका सज्ज, नालासोपाऱ्यात 41 इमारती पाडण्यास सुरुवात नालासोपारा पूर्वेतील अग्रवाल नगरी भागात 41 अनधिकृत इमारती पाडण्यासाठी आजपासून वसई विरार पासिका सज्ज झाली आहे. तोडक कारवाईसाठी मोठा लावाजामा पालिकेने तयार करुन आजपासून खाली इमारती तोडण्याचे काम सुरु करण्यात आलं आहे.
नालासोपारा पूर्वेतील अग्रवाल नगरी भागात 41 अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने वसई-विरार महानगरपालिकेला दिले होते. या इमारती कचराभूमी (डंपिंग ग्राउंड) आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी आरक्षित 30 एकर भूखंडावर बांधल्या होत्या. 2006 मध्ये काही भूभाग भूमाफिया आणि काही माजी स्थानिक राजकारण्यांनी बळकावला होता.
महापालिकेने या इमारतींतील सुमारे 2000 कुटुंबांना घरे रिकामी करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, स्थानिक रहिवासी हा निर्णय अन्यायकारक मानत असून पुनर्वसनाच्या मागणीसह विरोध करत आहेत.
मात्र उच्च न्यायालयाची अवमानना करत असल्याचा आरोप पालिकेवर झाला. विधानसभेच्या निवडणूका संपल्यावर पालिकेने आजपासून तोडक कारवाईला सुरुवात केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पराभवाची कारणमीमांसा उद्या होणार दिल्लीत महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पराभवाची कारणमीमांसा उद्या दिल्लीत होणार असल्याची माहिती आहे.
उद्या दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार असून या बैठकीला देशभरातील काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते राहणार उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रात कशामुळे काँग्रेसचा पराभव झाला यावरती सविस्तर चर्चा होणार असून शिवसेना ठाकरे गटाच्या 'एकला चलोरे'च्या भूमिकेसंदर्भातही चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात, राज्यातील पराभूत उमेदवारांशी करणार चर्चा पुणे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात
राज्यातील पराभूत उमेदवारांशी करणार चर्चा
राज्यातील जिल्हाध्यक्षही बैठकीला बोलावले
काल रात्री पुण्यातील पराभूत उमेदवार याच्याशी केली चर्चा
मनसेचा राज्यात एकही उमेदवार निवडून आला नाही
पुण्यात सकाळी 10 वाजल्यापासून शास्त्री रोडवर असलेल्या एका हॉलमध्ये बैठक घेणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सिरीयल किलरने वेगवेगळ्या राज्यात केल्या 25 दिवसात पाच हत्या, आरोपी वलसाड पोलिसांच्या ताब्यात वलसाड जिल्ह्यातील मोतीवाडा बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी राहुल सिंग जाट याला वलसाड पोलिसांनी अटक केली असून, आता या सिरियल किलरला शिक्षा देण्यासाठी वलसाड पोलीस जोरदार प्रयत्न करत आहेत. या रिमांड दरम्यान, वलसाड पोलीस या घटनेबाबत सर्व पुरावे गोळा करण्याचे काम करत असून, याप्रकरणी वलसाड जिल्हा पोलीस प्रमुखांनी एसआयटी स्थापन केली आहे. विशेष तपास पथकात दोन डीवायएसपी आणि पाच पीआय यांचा समावेश करण्यात आला आहे जे आजपासून डीवायएसपीसह संपूर्ण तपासावर देखरेख करतील. बी.एन. दवे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू असताना वलसाड पोलीस आज या गुन्हेगारासह मोतीवाडा गावात पोहोचले, तेथे त्या वेळी आरोपीसह घटनेची पुनर्रचना करण्यात आली. या घटनेबाबत मोतीवाला गावात मोठा जमाव जमला होता, स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संतापाची भावना होती, मोठ्या संख्येने महिला देखील आरोपीचा निषेध करत होत्या आणि सर्व लोकांची एकच मागणी होती की आरोपीला फाशी द्यावी. उल्लेखनीय म्हणजे आरोपीने गेल्या 25 दिवसात पाच निरपराधांची हत्या करून त्यांच्यासोबत बलात्कारासारखे कृत्य केले आहे, या संदर्भात वलसाड पोलीस आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. आरोपीने काटेरी कुंपण उडी मारून मुलीला कसे नेले व तेथेच ही घटना कशी घडवून आणली याबाबत सर्व प्रकारची माहिती आयोगासमोर दिली. यासोबतच वलसाड पोलिसांनी संपूर्ण राज्यात तसेच शेजारील राज्यांतही अशा घटना घडल्या आहेत का आणि या सीरियल किलरने अन्य काही गुन्हे केले आहेत का, याचाही तपास सुरू केला आहे तसेच वलसाड पोलिसांकडून करण्यात येत आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यात पुढील मुख्यमंत्री भाजपचाच जवळपास निश्चित झाल्यानंतर फडणवीस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव राज्यात पुढील मुख्यमंत्री हा भाजपचा होणार हे जवळपास निश्चित झाल्या नंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे…
देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या निवासस्थानी २० फुटाचे मोठे कटआऊट लागेल..
त्या कटआउट मध्ये देवेंद्र फडणवीस यांना“महाविजयाचे महाशिल्पकार “ असे संबोधण्यात आले आहे …
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा कोणत्याही एका आघाडीला २०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहे.
आज दिल्ली येथे महायुतीच्या नेत्यांची बैठक आहे… त्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची शिक्कामोर्तब केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
त्याआधीच नागपूर मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या समर्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.