कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. नरेंद्र मोदींनी बंगालमधील एका प्रचारसभेत आपल्याविरुद्ध चुकीचे आरोप केल्याचं अभिषेक बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना पाठवेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.


अभिषेक बॅनर्जी यांचे वकील संजय बसू यांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदींना विनाअट माफी मागण्यासाठी 36 तासांचा अवधी देण्यात आला आहे. त्यांना माफी न मागितल्यास त्यांना कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या विरोधात अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे.





नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?


"ममता बॅनर्जींच्या गुंडांनी भाजपच्या रोड शोमध्ये गोंधळ घातला होता, परंतु कोलकाताच्या जनतेने त्यांचा कट उधळून लावला. पश्चिम बंगालमध्ये डेमोक्रेसीचे रुपांतर गुंडाक्रेसीमध्ये झालं आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली होती. ममता बॅनर्जींनी राज्यात आणीबाणीसारखी स्थिती निर्माण केली असल्याचा गंभीर आरोप मोदींनी केला होता. ममता-अभिषेक यांनी बंगालला बदनाम केले आहे. दोन्ही नेत्यांनी राज्य लुटण्यात आणि राज्यात हिंसा पसरवणली आहे, अशी टीका मोदींनी केली होती.


VIDEO | ममतादीदी विकासातल्या स्पीड ब्रेकर, पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र | स्पेशल रिपोर्ट