Anil Deshmukh on Devendra Fadnavis : भारतीय जनता पार्टीच्या (BJP) पराभवात  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचांच सर्वात जास्त हात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली आहे. अनेक ठिकाणी भाजपला अपेक्षीत असं यश मिळालं नाही. अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला आहे. यावर बोलताना अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्यामुळं भाजपला सर्वात जास्त फटका बसल्याचे देशमुख म्हणाले. 


फडणवीसांचा दावा त्यांच्यावरच उलटला


वर्ध्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे हे आता विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. काळेंना तब्बल 80 हजाराची लीड असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी दिली आहे. वर्ध्यात शरद पवार यांच्यासाठी विदर्भातील ही एकमेव जागा प्रतिष्ठेची होती. इथं शरद पवार गटाचा विजय निश्चित झाला आहे. प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यातून राष्ट्रवादी काँग्रेस संपल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांचा हा दावा त्यांच्यावरच उलटल्याचे वक्तव्य देशमुख यांनी केलं आहे.