Yavatmal Crime News : आजघडीला मोबाईल ही काळाची गरज बनली असून मोबाईलमुळे जग माणसाच्या जवळ आले आहे, असे मानल्या जाते. मात्र असे असले तरी मोबाईलचा अतिजास्त वापर आणि त्याच्या आहारी जाऊन लागणारे व्यसन हे फार भयावह असू शकते. मोबाईलच्या अतिजास्त वापरातून होणाऱ्या अपघातांचे अनेक उदाहरण आपण बघतो अथवा वाचत असतो. अशाच एका मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरुणाने केवळ मोबईल रीचार्ज करायला पैसे न दिल्याच्या वादातून रागाच्या भरात  चक्क आपल्या आजीचा गळा आवळून हत्या (Crime News) केली. ही खळबळजनक घटना यवतमाळच्या (Yavatmal News)  बाभूळगाव तालुक्यातील रेणूकापूर येथे घडली. 76 वर्षीय सिंधुबाई भरत पोवते असे मृत आजीचे नाव आहे. तर 25 वर्षीय नातू महेश विश्वास पोवते आसे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात यवतमाळ पोलिसांनी (Yavatmal Police) आरोपीलाअटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.


रिचार्जल पैसे दिले नाही म्हणून आजीचा घोटला गळा


केवळ मोबाईलच्या रीचार्जसाठी पैसे दिले नाही या किरकोळ कारणावरून चिडलेलेल्या नातवाने रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणातील 25 वर्षीय आरोपी नातू महेश विश्वास पोवते याने मोबाईल रिचार्जसाठी आपल्या आजीकडे तगादा  लावला. मात्र आजीने त्यासाठी नकार दर्शविला. परिणामी आजी आणि नातवामध्ये फार वाद झाला आणि या वादातून चिडलेल्या नातवाने चक्क आपल्या आजीचा गळा आवळून खून केला.


आरोपी नातवाला ठोकल्या पोलिसांनी बेड्या 


ही गंभीर घटना यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील रेणूकापूर येथे घडली. ही घटना सिंधुबाई यांच्या मुलीच्या लक्ष्यात आल्यावर तीने पोलीस स्टेशन गाठून नातू महेश पावते विरोधात तक्रार दिली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या तक्रारीवरून यवतमाळ उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी  घटनास्थळी भेट देऊन आरोपी महेश विश्वास पोवतेला अटक केली. या प्रकरणात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. मात्र शवचिकित्सा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून करून आरोपीला अटक केली. या प्रकरणातील पुढील तपास बाभूळगाव पोलिस ठाणे करीत आहे. 


असे होते प्रकरण 


या प्रकरणातील आरोपी असलेल्या 25 वर्षीय नातू महेश विश्वास पोवते याचे गेल्या काही दिवसांपासून मोबाईलचा रीचार्ज संपला होता. रीचार्जसाठी आपल्याकडे पैसे नाही म्हणून त्याने आपल्या आजीकडे पैश्यांची मागणी केली. मात्र आजीने त्यास नकार दिला आणि त्याने पैसे देण्यासाठी परत आजीकडे तगादा लावला. त्यानंतर आजीचे आणि महेशचा वाद झाला आणि या वादातून राग अनावर झाल्याने महेशने हे टोकाचे पाऊल घेत आजीची गळा आवळला. अल्पावधीतच आजीचा जागीच मृत्यू झाला.